शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 05:09 IST

भारत-इंग्लंड मालिकेद्वारे डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात

ठळक मुद्देसामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना सहा - सहा गुण मिळतील, तर अनिर्णित सुटल्यास चार - चार गुण दिले जातील.

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला आगामी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेद्वारा सुरुवात होणार आहे. दोन वर्षे चालणाऱ्या या दुसऱ्या चॅम्पियनशिपदरम्यान विजयी संघाला १२ गुण दिले जातील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी केली.

सामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना सहा - सहा गुण मिळतील, तर अनिर्णित सुटल्यास चार - चार गुण दिले जातील. आयसीसीचे अंतरिम सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी काही दिवसांआधी गुणपद्धतीत बदल करण्याचे संकेत दिले होते. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन किंवा पाच सामने असले तरी, याआधी प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण असायचे. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रत्येक सामन्यासाठी गुण असतील. 

डब्ल्यूटीसीचा दुसरा टप्पा जून २०२३ ला संपणार असून त्यात भारत - इंग्लंड मालिकेसह पाच सामन्यांच्या ॲशेस मालिकेचा देखील समावेश असेल. पुढच्यावर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. सर्व नऊ संघांपैकी प्रत्येक संघ एकूण सहा मालिका खेळेल. त्यातील तीन मायदेशात, तर तीन प्रतिस्पर्धी संघांच्या देशात खेळाव्या लागतील. मागच्या टप्प्यात अशाच पद्धतीने सामने आयोजित झाले होते.डब्ल्यूटीसीच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळेल. त्यापाठोपाठ भारतीय संघ १९, ऑस्ट्रेलिया १८ आणि द. आफ्रिका १५ सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ प्रत्येकी १३-१३, तर पाकिस्तान संघ १४ कसोटी सामने खेळणार आहे.

n एका सामन्यासाठी जास्तीत जास्त १२ गुण मिळू शकतील. संघांनी सामने खेळून जे गुण संपादन केले, त्या गुणांच्याआधारे क्रमवारी देखील निश्चित केली जाईल. आगामी काही आठवड्यांत आयसीसी सीईओंच्या बैठकीत बदललेल्या गुणतालिकेला मंजुरी प्रदान केली जाईल.n बोर्डाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गुणपद्धतीला सोपे करण्याचा प्रयत्न असेल. संघ वेगवेगळ्या संख्येने सामने किंवा मालिका खेळले तरी, गुणांच्या आधारे त्यांची तुुलना सोपी व्हावी.

भारताच्या मालिका  ६मायदेशात           ३विदेशात           ३एकूण सामने:      १९ 

मायदेशातील मालिका

प्रतिस्पर्धी     वर्ष      सामनेन्यूझीलंड     नोव्हेंबर २०२१     २श्रीलंका     फेब्रुवारी २०२२     ३ऑस्ट्रेलिया     नोव्हेंबर २०२२     ४ 

विदेशातील मालिका

प्रतिस्पर्धी       वर्ष      सामनेइंग्लंड     ऑगस्ट २०२१     ५द. आफ्रिका     डिसेंबर २०२१     ३बांगला देश     नोव्हेंबर २०२२     २

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड