शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

सुदीरमन स्पर्धेतून भारत बाहेर

By admin | Published: May 27, 2017 12:39 AM

अव्वल मानांकित आणि दहावेळेचा चॅम्पियन चीनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत ०-३ ने पराभवाचा धक्का बसताच भारतीय संघ सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला.

गोल्ड कोस्ट (आॅस्ट्रेलिया) : अव्वल मानांकित आणि दहावेळेचा चॅम्पियन चीनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत ०-३ ने पराभवाचा धक्का बसताच भारतीय संघ सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला.नववे मानांकन लाभलेल्या भारतासाठी चीनचे आव्हान मोडित काढणे अवघड होते. अश्विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या मिश्र जोडीने लू काई-हुआंग याकियोंग या जागितक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोडीने कडवे आव्हान दिल्यानंतरही भारतीय जोडीला पराभूत व्हावे लागले. चीनच्या अनुभवी जोडीने पहिल्या सामन्यात अश्विनी- साईराज यांच्यावर १६-२१,२१-१३,२१-१६ ने एक तास तीन मिनिटांत विजय नोंदविला.के. श्रीकांत आणि आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीकांतने प्रारंभी प्रतिकार केला. ४८ मिनिटे चाललेल्या चढाओढीत श्रीकांत १६-२१, १७-२१ ने पराभूत झाला.सात्विक साईराज आणि चिराग सेन या युवा जोडीचा फू हायफेंग- झांग नान या जोडीने पुरुष दुहेरीत ९-२१,११-२१ ने पराभव करताच चीनची एकतर्फी आघाडी ३-० अशी झाली. यानंतरचा महिला एकेरीचा सामना केवळ औपचारिक होता. त्यानंतर महिला दुहेरीचा सामनादेखील खेळायचा होता पण सामन्याचा निकाल आधीच लागल्यामुळे हे दोन्ही सामने खेळविण्याची गरज भासली नाही. भारताने याआधी २०११ मध्ये स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. त्यावेळीदेखील चीनकडून १-३ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेत चीनने केवळ एक सामना गमविला होता. उपांत्य फेरीत चीनची गाठ जपान आणि मलेशिया यांच्यातील विजेत्यांविरुद्ध पडेल. (वृत्तसंस्था)