तिस-या दिवसाखेर भारत ४ बाद १९०, ४०३ धावांची आघाडी
By Admin | Updated: December 5, 2015 19:20 IST2015-12-05T09:43:27+5:302015-12-05T19:20:33+5:30
कर्णधार कोहली (नाबाद ८३) व अजिंक्य रहाणे (नाबाद ५२) यांच्या खेळीच्या जोरावर तिस-या दिवसाखेर भारताने ४ गडी गमावून १९० धावा करत एकूण ४०३ धावांची आघाडी घेतली.

तिस-या दिवसाखेर भारत ४ बाद १९०, ४०३ धावांची आघाडी
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - कर्णधार विराट कोहली (नाबाद ८३) व अजिंक्य रहाणे (नाबाद ५२) यांच्या खेळीच्या जोरावर तिस-या दिवसाखेर भारताने ४ गडी गमावून १९० धावा करत एकूण ४०३ धावांची आघाडी घेतली. रहाणे व कोहलीने पाचव्या विकेटसाठी नाबाद १३३ धावांची भागीदारी केली.
पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही भारताची सुरुवात अडखळत झाली होती. विजय (३) व रोहित शर्मा (०) हे आघाडीचे फलंदाज पटापट बाद झाल्याने भारताची स्थिती २ बाद ८ धावा अशी बिकट झाली. मात्र त्यानंतर शिखर धवन (२१) आणि चेतेश्वर पूजाराने (२८) डाव सावरत भारताला अर्धशतकी धावसंख्या गाठून दिली. पण त्यानंतर लगेच धवन व पुजारा बाद झाले आणि भारताची अवघ्या ५७ धावांत चार गडी गमावले.
दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्केलने ३ तर इम्रान ताहिरने १ बळी टिपला.