शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 08:15 IST

जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले.

ढाका : जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले. या दणदणीत विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत अपराजित राहताना साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही.

हरमनप्रीतने दहाव्या आणि ५३व्या मिनिटाला गोल केला. याशिवाय दिलप्रीत सिंग (२३ व्या मिनिटाला), जरमनप्रीत सिंग (३४), सुमित (४६) आणि शमशेर सिंग (५४) यांनीही प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात हातभार लावला. स्पर्धेत याआधीच भारताने उपांत्य फेरी निश्चित केली होती. त्यामुळे जपानविरुद्ध मिळालेली सरावाची संधी भारताने सोडली नाही. पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ आता १० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. भारतानंतर कोरिया (६), जपान (५), पाकिस्तान (२) आणि यजमान बांगलादेश (०) यांचा क्रमांक आहे. 

सलामीला कोरियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या भारताने सलग तिसरा विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केले. भारतीय संघाला उपांत्य फेरीत मंगळवारी जपानविरुद्ध खेळायचे आहे. स्पर्धेत राखलेल्या एकूण वर्चस्वाच्या जोरावर भारतीयांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. पहिल्या क्वॉर्टरपासून आक्रमक खेळ केलेल्या भारतीयांनी वेगवान खेळ करताना जपानला दबावात ठेवले. जपानने आक्रमक खेळ करताना भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीयांचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना सातत्याने अपयश आले. 

टॅग्स :Hockeyहॉकी