शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भारताच्या कबड्डी संघाने जिंकले सुवर्ण, इराणला नमवून ठरले आशियाई चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 12:56 IST

इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली.

भारताच्या पुरूष संघाने शुक्रवारी ११ व्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये तगड्या इराणवर ४२-३२ असा विजय मिळवताना सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्यांनी सर्वच्या सर्व सहा सामने जिंकले. इराणला त्यांनी साखळी फेरीत दोनवेळा आधीच पराभूत केले होते, परंतु आज इराणकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली.  

इराणच्या मोहम्मदने संघाचे खाते उघडले, अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्याने अखेर पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशा बरोबरीपर्यंत सामना अटीतटीचाच वाटत होता, परंतु नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या पकडी केल्या. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती. 

दुसऱ्या हाफमध्ये इराणकडून तुलनेने चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. भारताला केवळ पाच गुण कमावता आले, तर दुसरीकडे इराणने १६ गुणांची कमाई केली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी सावध खेळ करत ४२-३२ असा विजय पक्का केला. 

 

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ