शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

भारताचा २१४ धावांनी दारुण पराभव, ... द.आफ्रिकेचा मालिका विजय

By admin | Updated: October 25, 2015 22:14 IST

दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३६ षटकात २२४ धावात तंबूत परतला. द.आफ्रिकेने भारताचा २१४ धावांनी लाजिरवाना पराभव केला. भारताकडून रहाणे आणि शिखर धवनने एकतर्फी लढत दिली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ -  दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३६ षटकात २२४ धावात तंबूत परतला. द.आफ्रिकेने भारताचा २१४ धावांनी लाजिरवाना पराभव केला. द.आफ्रिकेने भारतात प्रथमच मालिका विजय मिळवत गांधी-मंडेला एकदिवसीय मालिका ३-२ने खिशात घातली.  भारताकडून रहाणे आणि शिखर धवनने एकतर्फी लढत दिली.
फलंदाज येत होते आणि हजेरी लाऊन जात होते. फलंदाजानी अनावश्क फटके मारुन आपल्या विकेट आफ्रिकेच्या गोलंदाजाना बहाल केल्या. सुरवातीलाच रोहित शर्मा (१६) व कोहली (७) हे दोन खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर. शिखर धवन (६०) व रहाणे (८७) यांनी शतकीय भागिदारी करत संघाला सावरले असे वाटत असतानाच शिखर धवन खराब फटका मारुन बाद झाला, त्यांनतर आलेला रैनाही फार काळ मैदानावर टिकला नाही. १२ धावाकाडून तंबूत परतला. राहणेने एकतर्फी झुंज दिली पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्यामुळे तो आपल्या वैयकतिक ८७ धावावर बाद झाला. कर्णधार धोणी २३ धावा काढून तंबूत परतला. आफ्रिकेच्या गोलंदाजानी भारताचे शेपूट झटपट बाद केले,  अक्षर पटेल (५), हरभजन(०), कुमार(१) अमित मिश्रा(४) धावा काढून बाद झाले.मोहित शर्मा ०० धावावर नाबाद राहिला. आफ्रिकेतर्फे रबाडाने सर्वाधिक ४ बळी घेतले, त्याला स्टेन(३), इमरान ताहिर(२), अॅबॉट(१) ने चांगली साथ देत भारतीय फलंदाजाना घरचा गस्ता दाखवला. 
त्यापुर्वी, डी कॉक (१०९), डू प्लेसिस (नाबाद १३३) व डी व्हिलीयर्स (११९) या तिघांनी भारतीय गोलंदाजांना झोडपून काढत शतके केल्याने दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेने ५० षटकांत ४ गडी गमावून ४३८ धावा केल्या.
भारतविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हाशिम अमला अवघ्या २३ धावांवर बाद झाल्याने त्यांना पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर डी कॉकने (१०९) फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. मात्र शतक पूर्ण झाल्यावर अवघ्या काही वेळातच तो बाद झाला. त्यानंतर डू प्लेसिसने (नाबाद १३३) भारतीय गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढलं, पण १३३ धावांवर खेळत असताना तो जखमी होऊन तंबूत परतला. त्यानंतर एबी डी व्हिलियर्सने ५७ चेंडूत शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील २३ वे तर भारतविरुद्धच्या मालिकेतील तिसरे शतक पूर्ण केले. ४६ व्या षटकांत तो बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३८४ इतकी होती. त्यानंतर मिलरने फटकेबाजी केल्याने आफ्रिकेवे चारशेचा टप्पा सहज पार केला आणि अखेर ५० षटकांत ४ बाद ४३८ अशी वानखेडे मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभारली. 
भारतातर्फे मोहित शर्मा, सुरेश रैना, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ बळी टिपला. भुवनेश्वर कुमारने १० षटकांत दिलेल्या तब्बल १०६ धावा भारताला चांगल्याच महागात पडल्या.