शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

भारत-बांगलादेश पहिला वन-डे आज

By admin | Updated: June 15, 2014 03:14 IST

स्टार खेळाडूंविना दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत रविवारी यजमान बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे

मीरपूर : स्टार खेळाडूंविना दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत रविवारी यजमान बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने राखीव खेळाडूंना छाप सोडण्याची संधी मिळाली आहे.बीसीसीआयने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह सात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रॉबिन उथप्पा, मनोज तिवारी, परवेज रसूल आणि अक्षर पटेल यांना प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. धोनी अ‍ॅण्ड कंपनीच्या अनुपस्थितीमुळे मालिकेचे वलय कमी झाले आहे. त्याचप्रमाणे फिफा विश्वकप स्पर्धेमुळे प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळणार नसल्याचे चिन्ह आहेत. भारतातील कुठल्याही अव्वल प्रसारक कंपनीने अद्याप थेट प्रसारणाचे हक्क विकत घेतलेले नाहीत, हे विशेष. भारतासाठी ही नव्या आंतरराष्ट्रीय मोसमाची सुरुवात आहे. आयपीएल स्पर्धेनंतर खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याची संधी मिळाली असून आता पुन्हा एकदा ते नव्या मोसमासाठी सज्ज झाले आहेत. मुरली कार्तिकची निवृत्ती भारताचा लेफ्टआर्म स्पीनर मुरली कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३७ वर्षीय कार्तिकने शनिवारी एका पत्रकार परिषदेत आपले संक्षिप्त निवेदन वाचून दाखविले, त्यात त्याने आपण निवृत्त होत असल्याचे म्हंटले आहे. आठ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतासाठी आठ कसोटी, ३७ वनडे आणि एक ट्ेंटी-२0 सामना खेळला आहे. (वृत्तसंस्था)