शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम

By admin | Published: March 28, 2017 1:15 PM

अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली.

ऑनलाइन लोकमतधरमशाला, दि. 28 - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली. कसोटी क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताच्या कसोटी इतिहासाच्या 85 वर्षात पहिल्यांदाच असा पराक्रम विराटसेने केला आहे. 2015मध्ये भारतीय संघाची श्रीलंका विरोधात विजयी रथाला सुरुवात झाली होती, अद्याप ती कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पराभव करत सलग सातव्या वेळीस भारताने विजय मिळवला. हा भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केल्यास रिकी पॉटिंगने आतापर्यंत सलग सर्वात जास्त विजय मिळवले आहेत. पॉटिंगने सलग 9 वेळा मालिका विजय मिळवला आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुणे येथे खेळलेल्य़ा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 333 धांवानी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. आणि तिसरा कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुंना यश आले होते. मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

विराटसेनेचे सलग सात मालिकाविजय

  1. - भारत विरुद्ध श्रीलंका 2-1 (3 टेस्ट) : 2015
  2. - भारत विरुद्ध द. अफ्रीका 3-0 (4) : 2015-16
  3. - भारत विरुद्ध वेस्टइंडीज 2-0 (4) : 2016
  4. - भारत विरुद्ध न्युझीलंड 3-0 (3) : 2016-17
  5. - भारत विरुद्ध इंग्लैंड 4-0 (5) : 2016-17
  6. - भारत विरुद्ध बांग्लादेश 1-0 (1) : 2016-17
  7. - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2-1 (4) : 2016-17