गुरकीरतची अष्टपैलू खेळी; भारत ‘अ’जिंक्य
By Admin | Updated: August 15, 2015 02:00 IST2015-08-15T02:00:56+5:302015-08-15T02:00:56+5:30
गुरकीरतसिंग मानच्या (नाबाद ८७ धावा व २ बळी) सुरेख अष्टपैलू खेळीच्या बळावर भारत अ संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम फेरीत आॅस्ट्रेलिया अ संघाला ४ गडी

गुरकीरतची अष्टपैलू खेळी; भारत ‘अ’जिंक्य
चेन्नई : गुरकीरतसिंग मानच्या (नाबाद ८७ धावा व २ बळी) सुरेख अष्टपैलू खेळीच्या बळावर भारत अ संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम फेरीत आॅस्ट्रेलिया अ संघाला ४ गडी राखून धूळ चारली.
भारताला विजयासाठी २२७ धावांचे लक्ष्य मिळाले होते; परंतु आघाडीची फळी पूर्णपणे कोलमडली. त्यानंतर गुरकीरतच्या नाबाद ८७ धावांच्या बळावर भारताने विजय मिळवला.
या मालिकेआधी भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध विजय मिळवता आला नव्हता; परंतु गेल्या सर्व पराभवाचा हिशेब भारतीय अ संघाने आज चुकता केला.
विजयाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे ४ फलंदाज धावफलकावर ६५ धावा असतानाच तंबूत परतले. फॉर्ममध्ये असणाऱ्या मयंक अग्रवालने २९ चेंडूंत ३२ धावा केल्या. एकवेळ भारताची स्थिती ५ बाद १०८ अशी होती; परंतु तळाच्या फळीने संकटमोचकाची भूमिका पार पाडली. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर ४१ धावांत २ गडी बाद करणाऱ्या गुरकीरतने फलंदाजीत कमाल केली. त्याने ८५ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व २ षटकार मारले. संजू सॅमसनने ४२ चेंडूंत २४ धावा केल्या. केदार जाधवने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह २९ धावांची उपयुक्त खेळी केली. आॅस्ट्रेलिया अ संघाकडून एस्टोन एगरने २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : ५० षटकांत ९ बाद २२६. (उस्मान ख्वाजा ७६, बर्न्स ४१, फर्ग्युसन २१. करण शर्मा ३/३७, गुरकीरतसिंह २/४२, अक्षर पटेल २/२५, धवल कुलकर्णी १/३२, के. नायर १/३३).
भारत अ संघ : ४३.३ षटकांत ९ बाद २२९. (गुरकीरतसिंग मान नाबाद ८७, मयंक अग्रवाल ३२, केदार जाधव २९, संजू सॅमसन नाबाद २४, उन्मुक्त चंद २४, एस्टोन एगर २/३९).