शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

गुजरात-झारखंड उपांत्य लढत आजपासून

By admin | Updated: January 1, 2017 01:10 IST

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा प्रियांक पांचाल आणि सर्वाधिक बळी घेणारा झारखंडचा शहबाज नदीम रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या

नागपूर : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा प्रियांक पांचाल आणि सर्वाधिक बळी घेणारा झारखंडचा शहबाज नदीम रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत आमने-सामने राहणार आहे. उभय खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघता लढत रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उभय संघांना प्रबळ दावेदार मानले जात नसले तरी यंदाच्या मोसमात तटस्थ स्थळावर खेळताना संघातील प्रतिभावान खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. गुजराततर्फे पांचालने ११०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या. सलामीवीर समित गोहेलने गेल्या लढतीत विश्वविक्रमी ३५९ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त यष्टिरक्षक कर्णधार पार्थिव पटेलच्या उपस्थितीमुळे गुजरात संघ बळकट झाला आहे. पार्थिवला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ४०० पेक्षा कमी धावांची गरज आहे. संघाला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची उणीव भासणार आहे. बोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही. यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघासाठी प्रमुख अस्त्र ठरणार आहे. बुमराहला या लढतीच्या निमित्ताने इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे मालिकेसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे. झारखंडची फलंदाजी बऱ्याच अंशी युवा ईशान किशनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने यंदाच्या मोसमात ७१९ धावा फटकावल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. त्याला सौरभ तिवारी व ईशांक जग्गी या अनुभवी खेळाडूंची चांगली साथ लाभली. युवा विराट सिंग गुजरातच्या गोलंदाजांपुढे अडचण निर्माण करू शकतो. झारखंडच्या यशामध्ये भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मेंटर म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली आहे. (वृत्तसंस्था)- झारखंडची आशा फिरकीपटू नदीमच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सिव्हिल लाईन्स स्टेडियमची खेळपट्टी अनुकूल ठरेल, अशी नदीमला आशा आहे. नदीमने आतापर्यंत ५० बळी घेतले आहे. त्याला राहुल शुक्लाची योग्य साथ लाभली आहे.