शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

ठरलं ! रविवारी भारत - पाकिस्तान भिडणार

By admin | Updated: June 15, 2017 22:36 IST

भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

ओव्हल, दि. 15 -  भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. भारतीय फलंदाजांचा एकंदरीत सुधारलेला फॉर्म पाहता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि पाकिस्तान या अंतिम सामन्याच्या लढतीत दोन्ही संघ जबरदस्त खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिक खऱ्या अर्थाने रविवारची पर्वणी मिळणार आहे. 10 वर्षांनंतर ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. याआधी 2007ला झालेल्या ICC टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडले होते. भारतीय संघ लागोपाठ दुस-यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. आता बांगलादेशलाही धडा शिकवल्यामुळे भारताच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, त्याप्रमाणेच क्षेत्ररक्षणही सुधारले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रविवारी भारत नक्कीच विजय खेचून आणेल, अशीच विराटच्या चाहत्यांना आशा आहे. युवराज सिंग कारकिर्दीतील 300वा सामना खेळून खिशात घातला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या चांगले गोलंदाज भारताजवळ असल्यानं भारताची बाजू मजबूत आहे. कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र तरीही भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. जर भारतानं विजय मिळवला तर क्रिकेट इतिहासात या विजयाची सर्वात मोठ्या विजयांमध्ये नोंद होईल.