शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा सुवर्ण धडाका; ऐश्वर्य तोमरचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:33 IST

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या आयएसएफएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मी. पिस्तूल गटात भारताने एकहाती वर्चस्व राखताना तिन्ही पदकांवर कब्जा केला. यावेळी, चिंकी यादवने सर्वांना प्रभावित करीत राही सरनोबत आणि मनू भाकर या अनुभवी नेमबाजांना मागे टाकत सुवर्णवेध घेतला. त्याचवेळी, पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने सुवर्णपदकावर नाव कोरले. 

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली. यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये चिंकीने जबरदस्त एकाग्रता दाखवताना राहीला ४-३ असे नमवले. या शानदार कामगिरीसह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या ९ झाली आहे. १९ वर्षीय मनूला एलिमिनेशन फेरीत २८ गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या तिन्ही नेमबाजांनी याआधीच टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. 

२०१९ साली १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकत चिंकीने टोकियोचे तिकीट मिळविले होते. पहिल्या २० नेममध्ये चिंकी १४ गुणांसह आघाडीवर होती, तर मनू १३ गुणांसह मागे होती. यानंतर चिंकीने पूर्ण वर्चस्व मिळवताना २१ गुणांसह आघाडी वाढविली, तर राहीने जबरदस्त पुनरागमन करीत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

ऐश्वर्य तोमरचा दबदबाभारताचा युवा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत भारताचे अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भोपाळच्या या २० वर्षीय नेमबाजाने ४६२.५ गुणांचा वेध घेत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या धडाक्यापुढे हंगेरीचा स्टार नेमबाज इस्तवान पेनी (४६१.६) आणि डेन्मार्कचा स्टेफेन ओलसेन (४५०.९) यांना अनुक्रमे रौप्य व कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 

अंतिम फेरीत ऐश्वर्यसोबत अनुभवी संजीव राजपूत आणि नीरज कुमार यांनीही प्रवेश केला होता. मात्र, दोघेही अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानी राहिले. २०१९ साली झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक जिंकत ऐश्वर्यने याआधीच टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते

नवी दिल्लीत सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावत आपल्यवरील भरवसा अधिक मजबूत केला आहे. भारताने कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत ९ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण १९ पदकांची लयलूट करत अव्वल स्थान काबिज केले आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार