शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भारतीयांचा सुवर्ण धडाका; ऐश्वर्य तोमरचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:33 IST

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या आयएसएफएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मी. पिस्तूल गटात भारताने एकहाती वर्चस्व राखताना तिन्ही पदकांवर कब्जा केला. यावेळी, चिंकी यादवने सर्वांना प्रभावित करीत राही सरनोबत आणि मनू भाकर या अनुभवी नेमबाजांना मागे टाकत सुवर्णवेध घेतला. त्याचवेळी, पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने सुवर्णपदकावर नाव कोरले. 

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली. यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये चिंकीने जबरदस्त एकाग्रता दाखवताना राहीला ४-३ असे नमवले. या शानदार कामगिरीसह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या ९ झाली आहे. १९ वर्षीय मनूला एलिमिनेशन फेरीत २८ गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या तिन्ही नेमबाजांनी याआधीच टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. 

२०१९ साली १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकत चिंकीने टोकियोचे तिकीट मिळविले होते. पहिल्या २० नेममध्ये चिंकी १४ गुणांसह आघाडीवर होती, तर मनू १३ गुणांसह मागे होती. यानंतर चिंकीने पूर्ण वर्चस्व मिळवताना २१ गुणांसह आघाडी वाढविली, तर राहीने जबरदस्त पुनरागमन करीत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

ऐश्वर्य तोमरचा दबदबाभारताचा युवा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत भारताचे अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भोपाळच्या या २० वर्षीय नेमबाजाने ४६२.५ गुणांचा वेध घेत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या धडाक्यापुढे हंगेरीचा स्टार नेमबाज इस्तवान पेनी (४६१.६) आणि डेन्मार्कचा स्टेफेन ओलसेन (४५०.९) यांना अनुक्रमे रौप्य व कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 

अंतिम फेरीत ऐश्वर्यसोबत अनुभवी संजीव राजपूत आणि नीरज कुमार यांनीही प्रवेश केला होता. मात्र, दोघेही अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानी राहिले. २०१९ साली झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक जिंकत ऐश्वर्यने याआधीच टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते

नवी दिल्लीत सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावत आपल्यवरील भरवसा अधिक मजबूत केला आहे. भारताने कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत ९ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण १९ पदकांची लयलूट करत अव्वल स्थान काबिज केले आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार