भारताने पाकला दिलेला शब्द पाळावा : पीसीबी

By Admin | Updated: September 7, 2015 00:10 IST2015-09-07T00:10:21+5:302015-09-07T00:10:21+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष

Follow the word given by India: PCB | भारताने पाकला दिलेला शब्द पाळावा : पीसीबी

भारताने पाकला दिलेला शब्द पाळावा : पीसीबी

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. शनिवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शहरयार यांनी आपले मत व्यक्त केले.
‘बिग थ्री’चे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडे स्वत:चे कारण होते आणि यामध्ये भारताबरोबर द्विपक्षीय मालिका खेळण्याचेदेखील ठरले
होते. भारताने आमच्यासोबत पुन्हा एकदा क्रिकेटसंबंध सुरू करण्याविषयी वचन दिले होते आणि यानंतर आम्ही ‘बिग थ्री’ व्यवस्थेला समर्थन दिले. यानंतरच बीसीसीआयने २०१५ ते २०२३ पर्यंत सहा मालिका खेळण्याचा करार
केला होता, असेही शहरयार खान
यांनी सांगितले.
शहरयार यांनी याबाबत आणखी सांगितले, की बीसीसीआयने जे वचन आम्हाला दिले होते ते त्यांनी पाळावे, हीच आमची अपेक्षा आहे. अजूनही भारत-पाक मालिकेबाबत मी आशावादी आहे.
दरम्यान, दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या करारानुसार पहिली क्रिकेट मालिका डिसेंबर २०१५ महिन्यात होणार असून यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश आहे. ही
मालिका पाकिस्तानच्या यजमानपदाखाली यूएईमध्ये खेळवली जाण्याची योजना होती. त्याचवेळी या वृत्ताबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा
झाली नसून बीसीसीआय सध्या सरकारकडून येणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Follow the word given by India: PCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.