शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अर्नेस्टचे आव्हान बालिशपणाचे, रिंगमध्येच त्याला कळेल ‘सिंग इज किंग’ - विजेंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 18:01 IST

अर्नेस्टविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी मी सज्ज असून त्याने मला दोन मिनिटामध्ये लोळवण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे कळाले. मला वाटते त्याचे हे आव्हान बालिशपणाचे असून खरा मुकाबला रिंगमध्येच रंगेल.

- रोहित नाईकमुंबई : अर्नेस्टविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी मी सज्ज असून त्याने मला दोन मिनिटामध्ये लोळवण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे कळाले. मला वाटते त्याचे हे आव्हान बालिशपणाचे असून खरा मुकाबला रिंगमध्येच रंगेल. त्याचेवेळी त्याला कळेल की सिंग इज किंग,’ अशा शब्दांत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने घानाचा बॉक्सर अर्नेस्ट अमुजू याला इशारा दिला आहे. विजेंदरने या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे ‘लोकमत’कडे सांगतानाच प्रतिस्पर्धी अर्नेस्टला नमवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. 

२३ डिसेंबरला जयपूर येथे विजेंदर सिंग आपली दहावी व्यावसायिक लढत खेळणार आहे. आतापर्यंत अपराजित असलेल्या विजेंदरने सलग ९ लढती जिंकताना व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आपला हिसका दाखवला आहे. अर्नेस्टकडे २५ लढतींचा अनुभव असून यापैकी त्याने २३ लढती जिंकल्या आहेत. असे असले, तरी केवळ ९ लढतींचा अनुभव असलेल्या विजेंदरकडे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल सुपर मिडलवेट अशी दोन जेतेपद आहेत, तर अर्नेस्टकडे एकही जेतेपद नाही. 

या गोष्टीकडे लक्ष वेधताना विजेंदरने  ‘लोकमत’ला सांगितले की, ‘अर्नेस्टने भलेही मला आव्हान दिले असेल, तरी त्याने विसरु नये की माझ्याकडे दोन बेल्ट आहेत, तर त्याच्याकडे एकही नाही. त्यामुळे असे बालिशपणाचे आव्हान माझ्यापुढे त्याने देऊ नये. अर्नेस्टला परिपक्व बनण्यास आणखी वेळ लागेल.’

विजेंदरच्या लढतीदरम्यान सहा अन्य भारतीय बॉक्सर अंडरकार्ड लढती खेळणार आहेत. याविषयी विजेंदर म्हणाला की, ‘नक्कीच ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. आज प्रो बॉक्सिंगकडे खेळाडूंची रुची वाढत आहे. परंतु, खेळाडूंनी ग्लॅमर किंवा पैसा पाहून येथे येऊ नये. प्रो बॉक्सर जरी वैयक्तिकरीत्या खेळत असला, तरी त्याच्यावर देशाचे नाव उंचावण्याची जबाबदारी असते. त्यामुळे व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय जिद्दही असावी लागते.’ खंत आॅलिम्पिकची....व्यावसायिक बॉक्सिंग हौशी बॉक्सिंगच्या तुलनेत पूर्ण वेगळे असते. व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला देशाकडून खेळता येत नाही. परिणामी आॅलिम्पिकमध्येही सहभागी होता येत नाही. आॅलिम्पिक पदक हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, पण व्यावसायिक बॉक्सर  म्हणून हे स्वप्न कधीच पूर्ण करता येत नाही याची खंत कायम राहणार, असेही विजेंदरने यावेळी म्हटले.यंदाच्या वर्षातील ही माझी अखेरची लढत असल्याने मला विजयी सांगता करायची आहे. जयपूर माझ्यासाठी नेहमीच एक भावनिक स्थळ राहिले आहे. येथे मी रेल्वेत टीसी म्हणून काम करत असताना राहिलो होतो. माझ्या देशवासीयांना वर्षाअखेरीस जल्लोष करण्याची संधी मी नक्की देईल.- विजेंदर सिंग

टॅग्स :boxingबॉक्सिंग