वॉन ऐस प्रकरणामुळे आजी-माजी खेळाडू स्तब्ध

By Admin | Updated: July 21, 2015 09:12 IST2015-07-21T00:40:53+5:302015-07-21T09:12:21+5:30

भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याला केवळ पाच महिन्यांच्या कालावधी उलटला असताना पॉल वॉन एस यांच्या पदावर

Due to the issue of Von Ace, the grand-aged players were stunned | वॉन ऐस प्रकरणामुळे आजी-माजी खेळाडू स्तब्ध

वॉन ऐस प्रकरणामुळे आजी-माजी खेळाडू स्तब्ध

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याला केवळ पाच महिन्यांच्या कालावधी उलटला असताना पॉल वॉन एस यांच्या पदावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या डच प्रशिक्षकाची अनुपस्थिती २०१६च्या आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अडथळा ठरू शकते, असे मत आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
वॉन एस यांनी हिमाचल प्रदेशातील शिलारूमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षक शिबिराला नियोजित वेळी उपस्थिती नोंदविली नाही. त्यांची प्रशिक्षकपदी राहण्याची इच्छा नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण बेल्जियममध्ये आयोजित विश्व हॉकी लीग सेमी फायनलमधील संघाच्या कामगिरीचा अहवाल त्यांनी अद्याप सादर केलेला नाही.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सणकी स्वभावाचे वॉन एस यांचा विश्व लीग सेमी फायनलमध्ये मलेशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीनंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यासोबत वाद झाला होता. सामन्यानंतर बत्रा मैदानात दाखल झाले आणि खेळाडूंसोबत चर्चा करीत होते. वॉन एस यांनी त्यांना रोखले व बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे बत्रा नाराज झाले.
एक सिनिअर खेळाडू म्हणाला, ‘‘प्रशिक्षक बदलला तर आमच्या तयारीवर निश्चितच परिणाम होईल. त्यामुळे सराव, कामगिरी आणि रियो आॅलिम्पिकच्या तयारीवर प्रभाव पडेल. खेळाडूंना प्रशिक्षकासोबत ताळमेळ साधण्यासाठी वेळ लागतो. वेळोवेळी मुख्य प्रशिक्षकामध्ये बदल झाला तर कामगिरी निश्चितच प्रभावित होईल.’’
हा खेळाडू पुढे म्हणाला, ‘‘टेरी वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ दीड वर्ष सराव केला. आम्हाला त्यांच्या शैलीची सवय झाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Due to the issue of Von Ace, the grand-aged players were stunned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.