शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंग प्रकरणामुळे खेळाडूंसोबत देशही त्रस्त होतो: किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:08 IST

अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

नवी दिल्ली : ‘भारतात डोपिंगचे प्रकार आमच्या चिंतेत भर पाडणारे असून, यामुळे खेळाडूसोबत देशाचीही प्रतिमा मलीन होते. भारतात पारदर्शी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी मंगळवारी केले.

भारतीय खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये अडकल्यास देशाची नाचक्की होत असल्याचे सांगून क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारताला पारदर्शी क्रीडा राष्ट्र बनविण्यासाठी डोपिंगमध्ये सामील लोकांना शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे अजाणतेपणे यात अडकणाऱ्यांना डोपिंगचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची वेळ आली आहे. डोपिंगची सर्वच प्रकरणे हेतुपुरस्पर केली जातात, असे मी म्हणणार नाही. मात्र काही खेळाडू हेतुपुरस्परपणे हे काम करतात. काही खेळाडू असेही आहेत जे नकळतपणे ड्रग्ज सेवन करतात. यासाठी स्वच्छ खेळाची प्रसिद्धी होण्याची गरज आहे. जे बेसावधपणे डोपिंगच्या आहारी जातात, त्यांची चूक सुधारण्याचे काम सूज्ञ नागरिकांना करावे लागेल.’

अभिनेता सुनील शेट्टी याला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचा (नाडा) ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर बनविण्याची घोषणा केल्यानंतर रिजिजु यांनी डोपिंगच्या दुष्परिणामापासून खेळाडूंना सावध केले. टोकियो आॅलिम्पिकला केवळ आठ महिने शिल्लक असून, यंदा देशातमोठ्या प्रमाणावर डोपिंगची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. रिजिजू पुढे म्हणाले,‘आमचे खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये दोषी आढळावेत, असे मला अपेक्षित नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतीमा मलिन होते.’ यंदा १५० हून अधिक खेळाडू देशात डोपिंगमध्ये दोषी आढळले. त्यात सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू आहेत.

‘देशात पारदर्शी आणि स्वच्छ क्रीडा संस्कृतीचा विकास करावा लागेल. खेळात असे प्रकार क्लेशदायी ठरतात. भारताला क्रीडा महाशक्ती बनायचे असेल तर खेळाडूंनी डोपिंगसारख्या प्रकारापासून दूर राहायला हवे. पारदर्शी खेळ ही काळाची गरज आहे,’ असेही रिजिजू यांनी यावेळी सांगितले.

यशाचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही

‘यशासाठी कुठलाही शॉर्टकट असूच शकत नाही. चारित्र्याची निर्मिती हळुवारपणे होते. मी ही मोहीम शालेयस्तरावर राबविण्यास इच्छुक आहे. खेळात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक मार्गाने जाण्याचा संदेश मुलांना द्यायचा आहे. भारत हा प्रामाणिक देश आहे, असा संदेशही याद्वारे द्यावा लागेल. आमचे अनेक प्रशिक्षक मुलांना वास्तविकतेची माहिती देण्याइतके प्रशिक्षित नाहीत, असे माझे प्रामाणिक मत आहे.’ - सुनील शेट्टी, अभिनेता

टॅग्स :Sunil Shettyसुनील शेट्टीIndiaभारत