शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डोपिंग प्रकरणामुळे खेळाडूंसोबत देशही त्रस्त होतो: किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:08 IST

अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

नवी दिल्ली : ‘भारतात डोपिंगचे प्रकार आमच्या चिंतेत भर पाडणारे असून, यामुळे खेळाडूसोबत देशाचीही प्रतिमा मलीन होते. भारतात पारदर्शी क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी मंगळवारी केले.

भारतीय खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये अडकल्यास देशाची नाचक्की होत असल्याचे सांगून क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारताला पारदर्शी क्रीडा राष्ट्र बनविण्यासाठी डोपिंगमध्ये सामील लोकांना शोधण्याची गरज आहे. दुसरीकडे अजाणतेपणे यात अडकणाऱ्यांना डोपिंगचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची वेळ आली आहे. डोपिंगची सर्वच प्रकरणे हेतुपुरस्पर केली जातात, असे मी म्हणणार नाही. मात्र काही खेळाडू हेतुपुरस्परपणे हे काम करतात. काही खेळाडू असेही आहेत जे नकळतपणे ड्रग्ज सेवन करतात. यासाठी स्वच्छ खेळाची प्रसिद्धी होण्याची गरज आहे. जे बेसावधपणे डोपिंगच्या आहारी जातात, त्यांची चूक सुधारण्याचे काम सूज्ञ नागरिकांना करावे लागेल.’

अभिनेता सुनील शेट्टी याला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचा (नाडा) ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर बनविण्याची घोषणा केल्यानंतर रिजिजु यांनी डोपिंगच्या दुष्परिणामापासून खेळाडूंना सावध केले. टोकियो आॅलिम्पिकला केवळ आठ महिने शिल्लक असून, यंदा देशातमोठ्या प्रमाणावर डोपिंगची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. रिजिजू पुढे म्हणाले,‘आमचे खेळाडू विदेशात डोपिंगमध्ये दोषी आढळावेत, असे मला अपेक्षित नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. खेळाडूंची आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतीमा मलिन होते.’ यंदा १५० हून अधिक खेळाडू देशात डोपिंगमध्ये दोषी आढळले. त्यात सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू आहेत.

‘देशात पारदर्शी आणि स्वच्छ क्रीडा संस्कृतीचा विकास करावा लागेल. खेळात असे प्रकार क्लेशदायी ठरतात. भारताला क्रीडा महाशक्ती बनायचे असेल तर खेळाडूंनी डोपिंगसारख्या प्रकारापासून दूर राहायला हवे. पारदर्शी खेळ ही काळाची गरज आहे,’ असेही रिजिजू यांनी यावेळी सांगितले.

यशाचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही

‘यशासाठी कुठलाही शॉर्टकट असूच शकत नाही. चारित्र्याची निर्मिती हळुवारपणे होते. मी ही मोहीम शालेयस्तरावर राबविण्यास इच्छुक आहे. खेळात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिक मार्गाने जाण्याचा संदेश मुलांना द्यायचा आहे. भारत हा प्रामाणिक देश आहे, असा संदेशही याद्वारे द्यावा लागेल. आमचे अनेक प्रशिक्षक मुलांना वास्तविकतेची माहिती देण्याइतके प्रशिक्षित नाहीत, असे माझे प्रामाणिक मत आहे.’ - सुनील शेट्टी, अभिनेता

टॅग्स :Sunil Shettyसुनील शेट्टीIndiaभारत