शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मिशन टोकियो : मिठाई, चॉकलेट नको रे बाबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 06:56 IST

भारतीय महिला हॉकी संघाने सोडला गोड वस्तू न खाण्याचा संकल्प

नवी दिल्ली : ‘मिशन टोकियो’अंतर्गत भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूने स्वत:च्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आवर घालण्याचा संकल्प सोडला आहे. देशाला पदक मिळवून द्यायचे असेल, तर फिट राहायलाच हवे. ‘फिट असू तरच हिट होऊ’या कॅचलाईनसह २०२० च्या आॅलिम्पिक पदकासाठी कठोर मेहनत करण्याचे खेळाडूंनी ठरविलेले दिसते.

कुणी स्वत:च्या पसंतीचे ‘राजमा चावल’ सोडले, तर कुणी मसालेदार पदार्थ आवडत असूनही त्याकडे पाठ फिरविली. मिठाई आणि चॉकलेटकडे यापुढे पाहायचेही नाही, असा खेळाडूंनी मनोमन निश्चय केला. गेल्या दोन वर्षांपासून शानदार कामगिरी करीत असलेल्या महिला हॉकी संघाला नोव्हेंबरमध्ये आॅलिम्पिक पात्रता फेरीद्वारे २०२० टोकियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करायचे आहे. त्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखायची नाही. कर्णधार राणी रामपाल हिचा तर आतापर्यंतचा हा सर्वात फिट भारतीय संघ असल्याचा दावा आहे. सर्वच खेळाडू सल्लागार वेन लोम्बार्ड यांच्या ‘डायट प्लान’चे कसून पालन करीत आहेत.

भारताचा महिला हॉकी संघ १९८० च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिला होता. आॅलिम्पिकचे महिला हॉकीतील हे पदार्पण होते. ३६ वर्षांनंतर संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला, पण १२ व्या स्थानावर राहिला. राणी म्हणाली, ‘गेल्या चार वर्षांत बरेच चित्र पालटले. रिओत आम्हाला अनुभव नव्हता. आॅलिम्पिक कसे खेळायचे, हे आता कळाले. रिओपासून बोध घेत आम्ही दोन वर्षांत बरीच प्रगती साधली.’

महिला हॉकी संघ सर्वात फिटएफआयएच हॉकी सिरिज फायनल्स जिंकून स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली कर्णधार राणी म्हणाली, ‘माझ्या मते हा सर्वांत फिट हॉकी संघ आहे. प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली. डायट प्लानचा अवलंब करून केवळ आॅलिम्पिक खेळायचे नाही, तर पदकही जिंकायचे आहे. आम्ही कार्बोहायड्रेट्स, मसालेदार, तेलकट जेवण सोडूले. चॉकलेट, मिठाई याकडे पाहतदेखील नाही. जपानवरून परतल्यानंतर केवळ एक दिवस आईच्या हातचे राजमा चावल खाल्ले होते.’

टॅग्स :Hockeyहॉकी