शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

धोनी सेना ग्रीनपार्कमध्ये अपराजित

By admin | Updated: October 10, 2015 05:34 IST

ग्रीनपार्कचे हिरवळ असलेले मैदान भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी लकी ठरलेले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व, तिन्ही वन-डे सामन्यांत

कानपूर : ग्रीनपार्कचे हिरवळ असलेले मैदान भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी लकी ठरलेले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व, तिन्ही वन-डे सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे. भारतीय कर्णधार कानपूरमध्ये अभेद्य योद्धा मानल्या जातो; पण त्याआधी टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० ने पराभव स्वीकारावा लागला, हे धोनीला विसरता येणार नाही. भारताला धरमशाला व कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला, तर ईडन गार्डन्समध्ये पाऊस व मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे तिसरी लढत रद्द झाली. टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला असला तरी ११ आॅक्टोबरपासून ग्रीनपार्कमध्ये प्रारंभ होत असलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत त्याचे मनोधैर्य उंचावलेले राहील, अशी आशा आहे. हे मैदान धोनीसाठी लकी असून टीम इंडिया मालिकेची विजायने सुरुवात करण्यास उत्सुक आहे. कॅप्टन कुल ग्रीनपार्कमध्ये केवळ वन-डे सामन्यांतच यशस्वी ठरला असे नाही तर येथे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांतही भारतीय संघाने विजयाची परंपरा कायम राखली. भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या धोनीने वन-डेमध्ये पदार्पण २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध केले होते, पण ग्रीनपार्कच्या खेळपट्टीची ओळख त्याला १५ एप्रिल २००५ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या वन-डे लढतीदरम्यान झाली. या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर २००७ मध्ये लांब केस असलेला धोनी या मैदानावर कर्णधार म्हणून दाखल झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा ४६ धावांनी पराभव करीत यापूर्वीच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. त्या दिवसापासून ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची विजयाची मोहीम आजतागायत कायम आहे. नशिबवान धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००८ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर पाच गडी राखून विजय मिळवला होता तर २७ नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडीज संघाला भारताविरुद्ध पाच गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. ७ जुलै १९८१ रोजी तत्कालीन बिहारच्या (सध्याचे झारखंड) रांचीमध्ये जन्मलेल्या धोनीने या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. त्या लढतीत आॅफ स्पिनर हरभजन सिंगने ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात चार बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. धोनीच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये भारताने येथे श्रीलंकेचा एक डाव १४४ धावांनी पराभव केला होता. त्या लढतीत गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी शतके झळकावली होती. भारताने या लढतीत ६४२ धावांची दमदार मजल मारली आणि श्रीलंका संघाला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)वन-डे मालिका सोपी नाही : ड्युमिनीदक्षिण आफ्रिका संघाने टी-२० सामन्यांच्या मालिकेत सहज विजय मिळविला असला, तरी त्यांचा स्टार फलंदाज जेपी ड्युमिनीच्या मते, आगामी वन-डे सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ दमदार पुनरागम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असेही ड्युमिनी म्हणाला.दक्षिण आफ्रिका संघाने धरमशाला व कटक येथे टी-२० सामन्यांत विजय मिळवून भारताचा मालिकेत २-० ने पराभव केला. तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला ड्युमिनी म्हणाला, ‘‘संघ म्हणून टीम इंडिया आगामी वन-डे व कसोटी मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करेल, अशी आशा आहे. वन-डे सामन्यांची मालिका सोपी राहील, असे आम्हाला कदापि वाटत नाही. कसून मेहनत घ्यावी लागणार असून, चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे, याची कल्पना आहे.’’वन-डे सामन्यांच्या मालिकेतील सलामी लढत कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. आमचा संघ या मालिकेतही चमकदार सुरुवात करण्यास उत्सुक आहे, असेही ड्युमिनी म्हणाला. ड्युमिनीने सांगितले की, आमचे लक्ष कानपूर लढतीवर केंद्रित झाले असून सुरुवात चांगली होईल, अशी आशा आहे. त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.