सुमार फलंदाजीमुळे पराभव : रोहित
By Admin | Updated: April 18, 2016 02:22 IST2016-04-18T02:22:20+5:302016-04-18T02:22:20+5:30
गुजरात लायन्सविरुद्ध आयपीएल-९ मध्ये आपल्या घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागणाऱ्या गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने निराशा व्यक्त करताना पराभवाचे खाप

सुमार फलंदाजीमुळे पराभव : रोहित
मुंबई : गुजरात लायन्सविरुद्ध आयपीएल-९ मध्ये आपल्या घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागणाऱ्या गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने निराशा व्यक्त करताना पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले.
सामन्यानंतर रोहित म्हणाला, की आम्ही या पराभवाने खूप निराश आहोत. घरच्या वातावरणात खेळताना आम्हाला विजयाची चांगली संधी होती; परंतु फलंदाजांचे अपयश कारणीभूत पडले. खेळपट्टी खेळाच्या दृष्टिकोनातून चांगली होती. येथे फलंदाज आणि गोलंदाजांसाठी समसमान संधी होती. या खेळपट्टीवर १५० ते १६० धावसंख्या चांगली ठरली असती; परंतु दुर्दैवाने आम्ही खराब फलंदाजी केली आणि सुरुवातीपासूनच विकेट विकेट गमावल्या. रोहितने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची प्रशंसा केली. तो म्हणाला, की आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी शानदार संघर्ष केला आणि १४३ या धावसंख्येचाही बचाव करण्याचा सुरेख प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)