शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकूनही सीतावर आली पाणीपुरी विकण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 21:20 IST

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही

ठळक मुद्देभारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

मुंबई : ऑलिम्पिक पदके भारतात यावी, यासाठी केंद्र सरकार मोठा निधी खर्च करताना दिसत आहे. आता तर खेळाडूंना ऑलिम्पिकच्या तयारीसाठीही चांगले पैसे मिळतात. एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले तर त्याच्यावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो असे नाही तर करोडोंची रोख पारितोषिकं आणि भेटवस्तू मिळतात. नोकऱ्यांनी ऑफर येते. देश अगदी डोक्यावर घेऊन मिरवत असतो. पण दोन ऑलिम्पिक पदके पटकावणाऱ्या एका खेळाडूवर मात्र चक्क रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आलेली आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यावर देशातील लोकांच्या गळ्यातील ताइत हे खेळाडू होतात. त्यांचे मोठे सत्कार होतात. राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांची भेट घेतात. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात करते. पण एक भारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत तिने थेट ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला, तरीही तिची दखल कोणी घेतली नाही. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर तरी आपली दखल घेतली जाईल, असे तिला वाटले होते. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावल्यावरही तिच्या पदरी रस्त्यावर पाणीपुरी विकण्याचीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

अथेन्स येथे २०११ साली विशेष ऑलिम्पिक भरवण्यात आले होते. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका खेळाडूने चक्क दोन पदके पटकावली. अॅथलेटीक्समध्ये २०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मध्य प्रदेशच्या सीता साहुने कांस्यपदकांची कमाई केली. पण साधे कौतुक तर सोडा, पण सध्या तिच्यावर रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आली असून तिने खेळ सोडून दिला आहे.

टॅग्स :IndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश