शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकूनही सीतावर आली पाणीपुरी विकण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 21:20 IST

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही

ठळक मुद्देभारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

मुंबई : ऑलिम्पिक पदके भारतात यावी, यासाठी केंद्र सरकार मोठा निधी खर्च करताना दिसत आहे. आता तर खेळाडूंना ऑलिम्पिकच्या तयारीसाठीही चांगले पैसे मिळतात. एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले तर त्याच्यावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो असे नाही तर करोडोंची रोख पारितोषिकं आणि भेटवस्तू मिळतात. नोकऱ्यांनी ऑफर येते. देश अगदी डोक्यावर घेऊन मिरवत असतो. पण दोन ऑलिम्पिक पदके पटकावणाऱ्या एका खेळाडूवर मात्र चक्क रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आलेली आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यावर देशातील लोकांच्या गळ्यातील ताइत हे खेळाडू होतात. त्यांचे मोठे सत्कार होतात. राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांची भेट घेतात. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात करते. पण एक भारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत तिने थेट ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला, तरीही तिची दखल कोणी घेतली नाही. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर तरी आपली दखल घेतली जाईल, असे तिला वाटले होते. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावल्यावरही तिच्या पदरी रस्त्यावर पाणीपुरी विकण्याचीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

अथेन्स येथे २०११ साली विशेष ऑलिम्पिक भरवण्यात आले होते. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका खेळाडूने चक्क दोन पदके पटकावली. अॅथलेटीक्समध्ये २०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मध्य प्रदेशच्या सीता साहुने कांस्यपदकांची कमाई केली. पण साधे कौतुक तर सोडा, पण सध्या तिच्यावर रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आली असून तिने खेळ सोडून दिला आहे.

टॅग्स :IndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश