शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकूनही सीतावर आली पाणीपुरी विकण्याची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 21:20 IST

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही

ठळक मुद्देभारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

मुंबई : ऑलिम्पिक पदके भारतात यावी, यासाठी केंद्र सरकार मोठा निधी खर्च करताना दिसत आहे. आता तर खेळाडूंना ऑलिम्पिकच्या तयारीसाठीही चांगले पैसे मिळतात. एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले तर त्याच्यावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो असे नाही तर करोडोंची रोख पारितोषिकं आणि भेटवस्तू मिळतात. नोकऱ्यांनी ऑफर येते. देश अगदी डोक्यावर घेऊन मिरवत असतो. पण दोन ऑलिम्पिक पदके पटकावणाऱ्या एका खेळाडूवर मात्र चक्क रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आलेली आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यावर देशातील लोकांच्या गळ्यातील ताइत हे खेळाडू होतात. त्यांचे मोठे सत्कार होतात. राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांची भेट घेतात. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्यावर पारितोषिकांची खैरात करते. पण एक भारताची महिला खेळाडू अशी आहे की, एका ऑलिम्पिकमध्ये चक्क दोन पदके जिंकून तिच्यावर खेळ सोडण्याची वेळ आली आहे.

तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिल रस्त्यावर पाणीपुरीचा व्यवसाय करायचे. दिवसा किती पैसे मिळतील, माहिती नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. पण तरीही देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न तिने आपल्या उराशी बाळगले. कसलीही मदत मिळत नव्हती. पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत तिने थेट ऑलिम्पिकसाठी प्रवेश मिळवला, तरीही तिची दखल कोणी घेतली नाही. ऑलिम्पिक पदक जिंकल्यावर तरी आपली दखल घेतली जाईल, असे तिला वाटले होते. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावल्यावरही तिच्या पदरी रस्त्यावर पाणीपुरी विकण्याचीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

अथेन्स येथे २०११ साली विशेष ऑलिम्पिक भरवण्यात आले होते. या विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका खेळाडूने चक्क दोन पदके पटकावली. अॅथलेटीक्समध्ये २०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मध्य प्रदेशच्या सीता साहुने कांस्यपदकांची कमाई केली. पण साधे कौतुक तर सोडा, पण सध्या तिच्यावर रस्त्यावर पाणीपुरी विकण्याची वेळ आली असून तिने खेळ सोडून दिला आहे.

टॅग्स :IndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेश