शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यानंतर मानखुर्द ते पनवेल व ठाणे ते नेरूळ हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला. मात्र नवी मुंबईत हा रेल्वे प्रकल्प उभारत असताना त्या ठिकाणच्या अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यानुसार प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांसाठी काही योजनाही राबवल्या. परंतु त्याचा लाभ अत्यल्प प्रकल्पग्रस्तांना झाला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अद्यापही रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांना गुणवत्तेनुसार रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रकल्पात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन केलेले आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेनेही नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी म्हात्रे यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनुसरून यासंबंधीचा अहवाल मागवून घेतला जाईल, असे उत्तरही रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून म्हात्रे यांना प्राप्त झाले आहे.(प्रतिनिधी)