शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची मागणी

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यानंतर मानखुर्द ते पनवेल व ठाणे ते नेरूळ हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला. मात्र नवी मुंबईत हा रेल्वे प्रकल्प उभारत असताना त्या ठिकाणच्या अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यानुसार प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांसाठी काही योजनाही राबवल्या. परंतु त्याचा लाभ अत्यल्प प्रकल्पग्रस्तांना झाला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अद्यापही रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांना गुणवत्तेनुसार रेल्वेमध्ये नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रकल्पात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन केलेले आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेनेही नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी म्हात्रे यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनुसरून यासंबंधीचा अहवाल मागवून घेतला जाईल, असे उत्तरही रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडून म्हात्रे यांना प्राप्त झाले आहे.(प्रतिनिधी)