शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

खेल परिषदेची निधी वाढविण्याची मागणी

By admin | Updated: January 11, 2016 03:21 IST

नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय खेल परिषदेने (एआयसीएस) खेळासाठी मिळत असलेला निधी देशाच्या जनसंख्येनुसार खूप कमी असल्याचे सांगत केंद्र सरकारने

नवी दिल्ली : नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय खेल परिषदेने (एआयसीएस) खेळासाठी मिळत असलेला निधी देशाच्या जनसंख्येनुसार खूप कमी असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली आहे.देशाच्या दृष्टीने सध्याचा ८८६ कोटी रुपयांचा खेळासाठीचा निधी खूपच कमी आहे आणि त्यासाठी सरकारने यात मोठ्या प्रमाणात वाढ करायला हवी. विविध शिफारशीत खेल परिषदेच्या सदस्यांनी पदकविजेत्यांसाठी राज्यांकडून एकसारखी बक्षीस रक्कम देण्याचेही आवाहन केले आहे, असे जवळपास अडीच तास चाललेल्या बैठकीनंतर एआयसीएसचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा म्हणाले.मल्होत्रा म्हणाले, ‘आम्हाला आपल्या क्रीडा धोरणाचा विस्तार करावा लागेल. आमचा निधी ८00 कोटी रुपयांचा आहे आणि प्रति व्यक्तीनुसार हे फक्त सात ते आठ रुपयेच होते. यातील काही राज्य गुजरात आणि हरियाणा हे चांगले करीत आहेत.’ या बैठकीत माजी भारतीय अ‍ॅथलिट पी.टी. उषा आणि माजी धनुर्विद्या प्रशिक्षक लिंबा रामदेखील उपस्थित होते. तथापि, माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर बैठकीस उपस्थित राहू शकला नाही. एआयसीएसने देशभरात १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफारस केली आहे. मल्होत्रा म्हणाले की, ‘प्रत्येक गावात खेळांच्या सुविधा असायला हव्या आणि खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निधी खेळाच्या सुविधा निर्माण करण्यावर खर्च करायला हवा. त्यासाठी आम्ही १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफरास केली आहे.’ या वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकविषयी ते म्हणाले की, ‘रिओ आॅलिम्पिकमध्ये भारत कमीत कमी १00 खेळाडूंचे पथक खेळवेल, अशी आम्हाला आशा आहे. याशिवाय आम्ही बॉक्सिंगसारख्या वादग्रस्त संघटनांवर तोडगा काढण्यावर चर्चा करीत आहोत.’(वृत्तसंस्था)