शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

By admin | Updated: April 2, 2016 01:19 IST

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला.

- वसिम अक्रम लिहितो़...भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला. दवामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते, आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना काही मदत मिळत नव्हती. वेगवान गोलंदाजांनाही अडचण भासत असल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. रसेल व सिमन्सने षटकार ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतर विंडीजला रोखणे कठीण होते. कुणालाच काही करता येत नव्हते. भारताने १९२ धावांची मजल मारल्यानंतर प्रत्येकाला ही धावसंख्या पुरेशी वाटत होती आणि लढत एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. विंडीज संघ त्यामुळेच वेगळा ठरतो. विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक आक्रमकता असल्यामुळे त्याला लक्ष्य गाठता आले. भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, हे यजमान संघाचे दुर्दैव. आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्याचा लाभ घेतला. काही लोक भारतीय संघाला १०-१५ धावा कमी पडल्याची चर्चा करीत आहेत. दव असताना अशा प्रकारच्या खेळपट्टीवर कुठल्याच गोलंदाजाला काही करता येत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. चेंडूवर पकड मिळवणे महत्त्वाचा घटक होता. चेंडू हातातून निसटत होता. वेगवान गोलंदाजांना केवळ स्लोअर वनचा वापर करता आला असता. बुमराहने तेच केले, पण काही वेळानंतर स्लोअर वन चेंडूलाही विंडीजच्या फलंदाजांनी स्टँडमध्ये भिरकावले. आजच्या आ धुनिक काळातही दवावर मात करण्यासाठी कुठल्या प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. दवावर नियंत्रण राखण्यासाठी स्पे्रचा वापर करता आला असता. (टीसीएम)