शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:48 IST

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कुणी सराव करणं सोडून दिलंय, तर रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी कुणी ब्रेक घेतलाय.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंनाही त्याचा फटका बसला आहे.

भारताच्या अॅथलिट्सवरही उपसामारीची वेळ आली आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कुणी सराव करणं सोडून दिलंय, तर रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी कुणी ब्रेक घेतलाय. परिस्थिती सुधरली नाही, तर पुढील आयुष्य हे हातगाडीवर केळी व फळं विकावी लागतील, अशी काहींना भीती वाटत आहे.

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धाच होत नसल्यानं गरीब घरातील खेळाडूंना स्वतःचा सराव कायम राखण्यात आणि त्याचा खर्च उचलण्यात अडचण येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिल्लीतील खेळाडूंच्या घटत्या संख्येबाबत प्रशिक्षक पुरषोत्तम यांच्याशी चर्चा केली आणि अशा खेळाडूंची व्यथा मांडली. 2017च्या आशियाई युवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेराज अली ( 19 वर्ष) याच्यासह ते अनेकांना प्रशिक्षण देतात. अलीच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. त्यात लहान बहिणी, मोठा भाऊ आणि आई-वडील असे सदस्य आहेत. पूर्वी दिल्लीतील श्रिलोकपूरी येथे अली भाड्याच्या घरात राहतो.  1500 मीटर शर्यतीतील धावपटूला दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

तो म्हणाला,''मागील डिसेंबर महिन्यात माझ्या वडिलांची किडनी काढण्यात आली. त्यांना आता आरामाची गरज आहे, परंतु त्यांना कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करावं लागत आहे. परिस्थिती न सुधारल्यास मलाही त्यांच्यासोबत काम करावं लागेल आणि खेळाडू बनण्याचं स्वप्न विसरावं लागेल. दूधही आम्हाला आता महाग वाटत आहे आणि त्यामुळे आम्ही चहा पिणंही सोडलं आहे.'' मिराजचा भाऊ टॅक्सी चालवायचा, परंतु त्याची नोकरी गेली.

चेन्नईतील उंच उडीपटू थाबिथा फिलिप महेश्वरन यानं 2019च्या आशियाई युथ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्याला कुटुंबाला मदत करण्यासाठी ब्रेक घ्याला लागला आहे. ''लॉकडाऊनमध्ये आम्हाला सर्वाधिक फटका बसला. NGO मला सपोर्ट करतात, परंतु त्यांनीही निधीत कपात करण्यास सुरुवात करत आहेत. माझे वडील रिक्षा चावलतात आणि कुटुंबाचा आर्थिक गाढा त्यांच्याच खांद्यावर आहे. पण, लॉकडाऊनमुळे तेही घरीच आहेत आणि त्यामुळे आम्हाला दोन वेळचं जेवणंही खाता येत नाही,''असे महेश्वरन यानं सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्ली