शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:48 IST

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कुणी सराव करणं सोडून दिलंय, तर रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी कुणी ब्रेक घेतलाय.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंनाही त्याचा फटका बसला आहे.

भारताच्या अॅथलिट्सवरही उपसामारीची वेळ आली आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कुणी सराव करणं सोडून दिलंय, तर रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी कुणी ब्रेक घेतलाय. परिस्थिती सुधरली नाही, तर पुढील आयुष्य हे हातगाडीवर केळी व फळं विकावी लागतील, अशी काहींना भीती वाटत आहे.

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धाच होत नसल्यानं गरीब घरातील खेळाडूंना स्वतःचा सराव कायम राखण्यात आणि त्याचा खर्च उचलण्यात अडचण येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिल्लीतील खेळाडूंच्या घटत्या संख्येबाबत प्रशिक्षक पुरषोत्तम यांच्याशी चर्चा केली आणि अशा खेळाडूंची व्यथा मांडली. 2017च्या आशियाई युवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेराज अली ( 19 वर्ष) याच्यासह ते अनेकांना प्रशिक्षण देतात. अलीच्या कुटुंबात सहा सदस्य आहेत. त्यात लहान बहिणी, मोठा भाऊ आणि आई-वडील असे सदस्य आहेत. पूर्वी दिल्लीतील श्रिलोकपूरी येथे अली भाड्याच्या घरात राहतो.  1500 मीटर शर्यतीतील धावपटूला दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

तो म्हणाला,''मागील डिसेंबर महिन्यात माझ्या वडिलांची किडनी काढण्यात आली. त्यांना आता आरामाची गरज आहे, परंतु त्यांना कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करावं लागत आहे. परिस्थिती न सुधारल्यास मलाही त्यांच्यासोबत काम करावं लागेल आणि खेळाडू बनण्याचं स्वप्न विसरावं लागेल. दूधही आम्हाला आता महाग वाटत आहे आणि त्यामुळे आम्ही चहा पिणंही सोडलं आहे.'' मिराजचा भाऊ टॅक्सी चालवायचा, परंतु त्याची नोकरी गेली.

चेन्नईतील उंच उडीपटू थाबिथा फिलिप महेश्वरन यानं 2019च्या आशियाई युथ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्याला कुटुंबाला मदत करण्यासाठी ब्रेक घ्याला लागला आहे. ''लॉकडाऊनमध्ये आम्हाला सर्वाधिक फटका बसला. NGO मला सपोर्ट करतात, परंतु त्यांनीही निधीत कपात करण्यास सुरुवात करत आहेत. माझे वडील रिक्षा चावलतात आणि कुटुंबाचा आर्थिक गाढा त्यांच्याच खांद्यावर आहे. पण, लॉकडाऊनमुळे तेही घरीच आहेत आणि त्यामुळे आम्हाला दोन वेळचं जेवणंही खाता येत नाही,''असे महेश्वरन यानं सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्ली