शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:54 IST

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो.

नवी दिल्ली : १५ मार्च १९७५ चा तो दिवस...पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशा गोलफरकाने लोळवून भारतीयहॉकी संघाने मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे विश्वविजयी पताका फडकाविली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ४६ वर्षे झाली. हॉकीचा एकमेव विश्वचषक जिंकलेला तो दिवस दुर्दैवाने कुणाच्याही स्मरणात नाही. चाहतेदेखील त्या जेतेपदाच्या नायकांना विसरले आहेत. (The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975)

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. सकाळपासून अभिनेत्री आलिया भटच्या वाढदिवसाच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर विशेष कार्यक्रमाच्या रूपाने झळकत आहेत; पण १९७५ च्या विश्वविजयाचा साधा उल्लेख देखील नाही,’ अशा शब्दांत त्यांनी स्वत:च्या मनातील सल व्यक्त केली.

‘त्यावेळी राष्ट्रवाद हॉकीशी निगडित होता. प्रत्येक विजयानंतर संपूर्ण देश आनंदात आणि उत्साहात न्हावून जात असे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे रेडिओवरील समालोचन अनेकांच्या स्मरणात आहे. राजकपूर यांनी वानखेडे स्टेडियमवर बॉलिवूड आणि विश्वविजेत्या हॉकी संघादरम्यान मैत्री सामन्याचे आयोजन केले होते. संपूर्ण बॉलिवूड हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकनंतर सर्वांत प्रभावी विजय कुठला असेल तर तो १९७५ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील जेतेपद हेच होते. भावी पिढी मात्र या विजयाचे महत्त्व ओळखू शकली नाही,’ अशी खंत अशोककुमार यांनी व्यक्त केली आहे.

त्या संघातील अन्य एक सदस्य अशोक दिवाण म्हणाले, ‘देशाने जिंकलेला तो पहिला विश्वचषक होता. त्यावेळी क्रिकेट विश्वचषकही जिंकला नव्हता. त्या जेतेपदाला पूर्ण सन्मान मिळायला हवा. भारताने २०२३ ला पुन्हा विश्वचषक जिंकावा, अशी मी अपेक्षा बाळगतो. १९७५ च्या विश्वचषक विजयाचा दरवर्षी जल्लोष करण्याचे आम्ही काही खेळाडूंनी ठरविले होते, असे १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिक हॉकी संघाचे सदस्य राहिलेले वरिंदरसिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘२०१८ ला भुवनेश्वर येथे विश्वचषक हॉकीचे आयोजन झाले त्यावेळी आम्ही सर्वजण आठवडाभर सोबत होतो. जुन्या आठवणींना त्यावेळी उजाळा दिला. सोबत बसून  सामन्यांचा आनंद लुटला. त्यानंतर मात्र एकत्र येणे जमले नाही. ज्या पद्धतीने बीसीसीआयने माजी खेळाडूंना जोडून ठेवले आहे तशीच व्यवस्था हॉकीत असायला हवी.  आयपीएलसारखी हॉकीत लीगची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे जुनेजाणते खेळाडू एकत्र यायचे. मात्र, लीग बंद पडली. भविष्यात असा प्रयत्न पुन्हा व्हावा.’ 

‘भारताचा हा पहिलाच विश्वचषक होता. आजपर्यंत आम्ही दुसऱ्या जेतेपदाची प्रतीक्षा करीत आहोत. १५ मार्चला दरवर्षी आम्ही त्या संघातील जीवित सदस्य, तसेच हॉकी समुदायातील लोक एकमेकांचे अभिनंदन करतो. अन्य कोणाला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण होत नसावे. काही देणेघेणे नाही. असेच होत राहिल्यास भावी पिढीला काही कळणार नाही.’- अशोक दिवाण, विश्वविजेत्या संघाचे सदस्य 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान