शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:54 IST

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो.

नवी दिल्ली : १५ मार्च १९७५ चा तो दिवस...पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशा गोलफरकाने लोळवून भारतीयहॉकी संघाने मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे विश्वविजयी पताका फडकाविली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ४६ वर्षे झाली. हॉकीचा एकमेव विश्वचषक जिंकलेला तो दिवस दुर्दैवाने कुणाच्याही स्मरणात नाही. चाहतेदेखील त्या जेतेपदाच्या नायकांना विसरले आहेत. (The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975)

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. सकाळपासून अभिनेत्री आलिया भटच्या वाढदिवसाच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर विशेष कार्यक्रमाच्या रूपाने झळकत आहेत; पण १९७५ च्या विश्वविजयाचा साधा उल्लेख देखील नाही,’ अशा शब्दांत त्यांनी स्वत:च्या मनातील सल व्यक्त केली.

‘त्यावेळी राष्ट्रवाद हॉकीशी निगडित होता. प्रत्येक विजयानंतर संपूर्ण देश आनंदात आणि उत्साहात न्हावून जात असे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे रेडिओवरील समालोचन अनेकांच्या स्मरणात आहे. राजकपूर यांनी वानखेडे स्टेडियमवर बॉलिवूड आणि विश्वविजेत्या हॉकी संघादरम्यान मैत्री सामन्याचे आयोजन केले होते. संपूर्ण बॉलिवूड हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकनंतर सर्वांत प्रभावी विजय कुठला असेल तर तो १९७५ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील जेतेपद हेच होते. भावी पिढी मात्र या विजयाचे महत्त्व ओळखू शकली नाही,’ अशी खंत अशोककुमार यांनी व्यक्त केली आहे.

त्या संघातील अन्य एक सदस्य अशोक दिवाण म्हणाले, ‘देशाने जिंकलेला तो पहिला विश्वचषक होता. त्यावेळी क्रिकेट विश्वचषकही जिंकला नव्हता. त्या जेतेपदाला पूर्ण सन्मान मिळायला हवा. भारताने २०२३ ला पुन्हा विश्वचषक जिंकावा, अशी मी अपेक्षा बाळगतो. १९७५ च्या विश्वचषक विजयाचा दरवर्षी जल्लोष करण्याचे आम्ही काही खेळाडूंनी ठरविले होते, असे १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिक हॉकी संघाचे सदस्य राहिलेले वरिंदरसिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘२०१८ ला भुवनेश्वर येथे विश्वचषक हॉकीचे आयोजन झाले त्यावेळी आम्ही सर्वजण आठवडाभर सोबत होतो. जुन्या आठवणींना त्यावेळी उजाळा दिला. सोबत बसून  सामन्यांचा आनंद लुटला. त्यानंतर मात्र एकत्र येणे जमले नाही. ज्या पद्धतीने बीसीसीआयने माजी खेळाडूंना जोडून ठेवले आहे तशीच व्यवस्था हॉकीत असायला हवी.  आयपीएलसारखी हॉकीत लीगची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे जुनेजाणते खेळाडू एकत्र यायचे. मात्र, लीग बंद पडली. भविष्यात असा प्रयत्न पुन्हा व्हावा.’ 

‘भारताचा हा पहिलाच विश्वचषक होता. आजपर्यंत आम्ही दुसऱ्या जेतेपदाची प्रतीक्षा करीत आहोत. १५ मार्चला दरवर्षी आम्ही त्या संघातील जीवित सदस्य, तसेच हॉकी समुदायातील लोक एकमेकांचे अभिनंदन करतो. अन्य कोणाला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण होत नसावे. काही देणेघेणे नाही. असेच होत राहिल्यास भावी पिढीला काही कळणार नाही.’- अशोक दिवाण, विश्वविजेत्या संघाचे सदस्य 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान