शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

coronavirus: अर्जुन पुरस्कारासाठी दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पंघाल नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:56 IST

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले.

 नवी दिल्ली : आशियन गेम्सचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पंघाल याने शुक्रवारी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया बदलण्याची विनंती केली आणि सध्याची पद्धत भेदभाव करणारी असल्याचे म्हटले. वर्ष २०१२ मध्ये अनवधानाने झालेल्या डोपिंगच्या गुन्ह्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी सातत्याने त्याला डावलण्यात येत आहे. क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पंघालने म्हटले की, खेळाडूंनी स्वत: नामांकन करीत अर्ज करायला नको.गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविणारा भारताचा पहिला पुरुष बॉक्सर ठरलेल्या पंघालने पत्रात म्हटले की, ‘सध्याच्या प्रक्रियेनुसार एका खेळाडूला अर्ज करता येतो आणि त्यानंतर क्रीडा समिती या अर्जाच्या आधारावर निवड करते. पुरस्कार निवडीमध्ये क्रीडा समितीतील सदस्यांतर्फे भेदभाव करणारे निर्णय होतात. त्यासाठी त्यांना कुणाला उत्तरही द्यावे लागत नाही.’ पंघालची दोनवेळा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेली आहे, पण डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या नावावर विचार झालेला नव्हता. (वृत्तसंस्था)‘जगातील प्रतिष्ठेचे जास्तीत जास्त पुरस्कार नामांकनाचा विचार न करता देण्यात येतात. कारण योग्य विचार केला तर पुरस्कार हा खेळाडूच्या कामगिरीचा सन्मान आहे. सध्याची प्रक्रिया ब्रिटिश काळातील जुन्या प्रक्रियेप्रमाणे आहे. येथे चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला स्वत:चा पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो. जर या पुरस्कारांना नामांकन मुक्त करण्यात आले तर तुम्ही भारतीय क्रीडा प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल कराल. या बदलाचा विचार करावा, ही विनंती. मी तुमचा आभारी असेन.’- अमित पंघाल

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत