शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो!

By admin | Updated: October 7, 2014 03:04 IST

नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले.

मुंबई : नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले. खेळातील सातत्य आणि एकाग्रता यामुळेच यश मिळवणे शक्य झाल्याचे तो म्हणाला. आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या (ओजीक्यू) वतीने मुंबईत आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओजीक्यूचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून बॉलिवूड स्टार सैफ अली खान याच्या नावाची घोषणा करण्यात आली.इंचियोन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध घेत जीतूने इतिहास घडविला. या यशामागे अथक परिश्रम, एकाग्रता आणि खेळाप्रती असलेले प्रेम यामुळेच ही यशाची भरारी घेणे शक्य झाल्याचे जीतूने सांगितले. पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका अवतीभवती पाहून काहीसा भारावलेला जीतू प्रत्येक प्रश्नाला स्मितहास्याने उत्तर देत होता. आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकणे ही स्वप्नवत बाब असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘दक्षिण कोरियात भारतीय ध्वज मोठ्या डौलाने फडकण्यास मी कारणीभूत ठरलो, याहून अभिमानाची बाब काहीच असू शकत नाही. नेमबाजीत सातत्य महत्त्वाचे असते. भारतीय लष्कराकडून मिळाल्याने हे सुवर्णपदक पटकावू शकलो.’ नेपाळमधील संखुआ सभा जिल्ह्यात जन्मलेल्या या खेळाडूला आता संपूर्ण भारत ओळखतो. मात्र हे खरे असले तरी आजही प्रत्येकाला स्वत:ची ओळख करून द्यावी लागते, याची त्याला खंत वाटते.