शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड; भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:14 IST

पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे.

मामल्लापुरम : काही आघाडीच्या संघांच्या अनुपस्थितीत गुरुवारपासून रंगणाऱ्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत यजमान भारत पदकाचा संभाव्य दावेदार म्हणून खेळेल. जागतिक बुद्धिबळमध्ये वर्चस्व राखणारे रशिया व चीन यांचे संघ यंदा सहभागी होणार नाहीत. यंदा भारताने खुल्या व महिला गटात प्रत्येकी ३ संघ खेळविले आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष भारतीयांच्या चालींवर लागलेले असेल.

पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे. मात्र, आनंद भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याने भारताला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. भारत अ संघाला अमेरिकेनंतर दुसरे मानांकन लाभले आहे. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत ब संघाला ११वे मानांकन लाभले आहे. या संघाला डार्कहॉर्स मानले जात असून या संघातील खेळाडू कोणत्याही खेळाडूला धक्का देण्याची क्षमता राखून आहेत. 

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा खुल्या गटात विक्रमी १८८ संघ आणि महिला गटात १६२ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सहा संघ भारताचे आहेत. यजमान असल्याने भारताला अतिरिक्त संघ खेळविण्याचा फायदा मिळाला आहे. रशिया आणि चीन यांच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील आव्हान काहीसे सोपे झाले असून, अन्य संघातील खेळाडूंना आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळाली आहे. 

यंदा ठरणार का किंग?भारताने यंदा सुवर्ण पदक पटकावण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. २०१४ साली नॉर्वेतील ट्रॉमसो येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते. २०२० मध्ये झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांनी रशियासह संयुक्तपणे विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा एकदा भारताने कांस्य पदक पटकावले होते. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ