शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड; भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:14 IST

पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे.

मामल्लापुरम : काही आघाडीच्या संघांच्या अनुपस्थितीत गुरुवारपासून रंगणाऱ्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत यजमान भारत पदकाचा संभाव्य दावेदार म्हणून खेळेल. जागतिक बुद्धिबळमध्ये वर्चस्व राखणारे रशिया व चीन यांचे संघ यंदा सहभागी होणार नाहीत. यंदा भारताने खुल्या व महिला गटात प्रत्येकी ३ संघ खेळविले आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष भारतीयांच्या चालींवर लागलेले असेल.

पाच वेळचा विश्वविजेता दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे. मात्र, आनंद भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याने भारताला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. भारत अ संघाला अमेरिकेनंतर दुसरे मानांकन लाभले आहे. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत ब संघाला ११वे मानांकन लाभले आहे. या संघाला डार्कहॉर्स मानले जात असून या संघातील खेळाडू कोणत्याही खेळाडूला धक्का देण्याची क्षमता राखून आहेत. 

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा खुल्या गटात विक्रमी १८८ संघ आणि महिला गटात १६२ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सहा संघ भारताचे आहेत. यजमान असल्याने भारताला अतिरिक्त संघ खेळविण्याचा फायदा मिळाला आहे. रशिया आणि चीन यांच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील आव्हान काहीसे सोपे झाले असून, अन्य संघातील खेळाडूंना आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळाली आहे. 

यंदा ठरणार का किंग?भारताने यंदा सुवर्ण पदक पटकावण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. २०१४ साली नॉर्वेतील ट्रॉमसो येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते. २०२० मध्ये झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांनी रशियासह संयुक्तपणे विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा एकदा भारताने कांस्य पदक पटकावले होते. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ