शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

VIDEO: भारतात फुटबॉल क्रिकेटची बरोबरी करू शकेल का? सुनील छेत्रीच्या उत्तरानं जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:46 IST

भारतात क्रिकेटप्रेमींच्या संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

नवी दिल्ली : भारतात क्रिकेटप्रेमींची संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र जगातील सर्वात प्रसिद्ध असलेला फुटबॉलचा खेळ भारतात तितकासा प्रसिद्ध नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या फिफा विश्वचषकाने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. मात्र या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची भारताला संधी देखील मिळाली नाही. अशातच भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीची एक मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. 

सुनिल छेत्रीने भारतीय फुटबॉलच्या भविष्याबाबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये पत्रकार सुनील छेत्रीला विचारतो की, फुटबॉलने मागील अनेक वर्षात चांगली प्रगती केली आहे. मग तुला काय वाटते  भारतात फुटबॉल कधी क्रिकेटची बरोबरी करू शकेल का? पत्रकाराच्या प्रश्नाला भारतीय कर्णधाराने देखील शानदार उत्तर दिले. 

आपण विश्वविजेते आहोत - छेत्री सुनिल छेत्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. छेत्री उत्तर देताना म्हणतो, "'सर सर्वप्रथम मला खूप आनंद होतो की आपल्या देशात क्रिकेट खूप चांगले चालले आहे, जेव्हा धोनी आणि विराट स्पर्धा आणि सामने जिंकतात तेव्हा मला खूप आनंद होतो. मुद्दा असा नाही की आपल्याला क्रिकेटशी स्पर्धा करायची आहे. मुद्दा असा आहे की आपण प्रत्येक सामन्यात चांगले असले पाहिजे. क्रिकेटने नाव कमवावे आणि क्रिकेट खूप मोठे व्हावे असे मला वाटते. जेव्हा कोणी मला बोलते की क्रिकेटमध्ये आपण विश्वविजेते आहोत, तेव्हा मला खूप आनंद होतो."

जितके मोठे क्रिकेट असेल तितके ते आपल्यासाठी चांगले पुढे बोलताना छेत्री म्हणतो, "जेव्हा मी भारताची जर्सी घालतो आणि आम्ही स्पर्धा जिंकतो तेव्हा मला खूप आनंद होतो. सायना नेहवाल स्पर्धा जिंकते तेव्हा मला आनंद होतो. तर याचा अर्थ असा नाही की कोणी चांगले करत आहे आणि दुसरा खाली येत आहे आणि आपण वर जात आहे. याचा काहीच फायदा नाही कारण तो खेळाडू इतर कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसून आपल्या देशासाठी खेळत आहे. त्यामुळे जितके मोठे क्रिकेट असेल तितके ते आपल्यासाठी चांगले आहे. पण आपण 1.3 अब्ज लोकसंख्येचा देश असल्यामुळे इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी करू शकतो असे मला वाटते. भारतीय कर्णधाराचा हा व्हिडीओ जवळपास 6 वर्षे जुना आहे, मात्र फिफा विश्वचषकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२IndiaभारतIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री