शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाकिस्तान फुटबॉल संघाचा भारतातील स्पर्धेवर बहिष्कार

By admin | Updated: November 24, 2015 00:14 IST

अथक प्रयत्न करूनही भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका जुळून येण्याची शक्यता नसल्याचा राग पाकिस्तानने भारतात होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेवर काढला असून,

कराची : अथक प्रयत्न करूनही भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका जुळून येण्याची शक्यता नसल्याचा राग पाकिस्तानने भारतात होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेवर काढला असून, पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या (सॅफ) स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली आहे. ‘सॅफ’चे महासचिव अनवरूल हक हेलाल म्हणाले, मला पाकिस्तान फुटबॉल संघाकडून (पीएफएफ) एक मेल प्राप्त झाला. त्यात त्यांनी स्पर्धेतून संघ माघार घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र, माघारीचे कोणतेही कारण त्यात देण्यात आलेले नाही. पुढील महिन्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान तिरुवअनंतपूरम येथे ही स्पर्धा होत आहे. त्यात भारत व पाकिस्तान संघ ‘अ’ गटात होते. त्याचबरोबर या गटातच नेपाळ व श्रीलंकादेखील आहेत. ‘ग्रुप-बी’मध्ये मालदीव, भूतान, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राच्या मते, पाकिस्तान फुटबॉल संघटनेत सत्तासंघर्ष सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेतून माघार घेण्यात आली आहे. या गटबाजीवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने संघटनेच्या सर्व प्रक्रियेलाच स्थगिती दिल्याने संघटनेला हा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा कर्णधार कलीमुल्लाह याने मात्र या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. पाकिस्तान फुटबॉल संघटनाच फुटबॉलला गांभीर्याने घेत नाही. संघटनेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. (वृत्तसंस्था)