शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:35 IST

आज सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-05 असा एक डाव बारा गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला.

काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे सुरू आहेत. सुरवातीला सुपर लीग पध्दतीने सुरू असलेले सामने अंतिम टप्यात असून उद्या उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. भारताने श्रीलंका व नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला असून सलग दुसर्‍या सुवर्ण पदकाकडे वाटचाल सुरू असल्याचे कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने सगीतले.  

आज सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-05 असा एक डाव बारा गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात भारताच्या दिपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे तीस सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, तपन पालने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले तर सागर पोद्दार व अक्षय गणपुलेने संरक्षण करताना प्रत्येकी तीन-तीन मिनिटांचा पळतीचा खेळ करून भारताच्या  विजयात मोलाचा वाटा उचलला. तर नेपाळच्या बुद्धकुमार थापाने व मिलन रायने चांगला खेळ केला. मात्र ते आपल्या संघाला मोठ्या परवापासून वाचू शकले नाहीत.

महिलांच्या सुपर लीग पद्धतीने झालेल्या सामन्यात भारताने नेपाळवर 11-03 असा एक डाव आठ गुणांनी मोठा विजय साजरा केला. भारताच्या पहिल्या डावात मुकेश तीन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करून बाद झाली त्यानंतर प्रियंका भोपीने संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेत नाबाद पाच मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. दुसऱ्या डावात अपेक्षा सुताराने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात एक खेळाडू बात केला त्यानंतर कृष्णा यादव ने संरक्षण करताना दोन मिनिटे चाळीस सेकंद पळतीचा खेळ केला व शेवटी ऐश्वर्या सावंतने नाबाद खेळी करताना तीन मिनिटे वीस सेकंद रक्षण केलं. या सामन्यात कर्णधार नसरीनने चार खेळाडूंना बाद करून भारतासाठी मोठा विजय निश्चित केला. या सामन्यात पौर्णिमा सकपाळ, सस्मिता शर्मा व काजल भोरने आक्रमणात प्रत्येकी दोन दोन खेळाडू बाद केले. तर पराभूत नेपाळच्या अंजली थापाने संरक्षण करताना दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिट चाळीस सेकंद पळतीचा खेळ केला, त्यांच्याच बी. के. दिपाने संरक्षण करताना एक मिनिट वीस सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले. मात्र इतर खेळाडूंची त्यांना योग्य साथ न मिळाल्याने नेपाळला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 13-07 असा एक डाव सहा गुणांनी दणदणीत पराभव केला तर महिलांच्या सामन्यात बांगलादेशने नेपाळवर 14-09 असा एक डाव पाच गुणांनी मोठा विजय मिळवला.

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारत