शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 19:43 IST

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला.

काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे सुरू आहेत. आज भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचे सामने सहज जिंकल्याने उद्या पुरुषांमध्ये भारत वि. बांगलादेश तर महिलांमध्ये भारत वि. नेपाळ अंतिम फेरीत लढत देणार आहेत. मुंबई व भारताचा आघाडीचा खेळाडू श्रेयस राऊळ याने उद्याच्या अंतिम सामन्यात आम्ही आक्रमक रणनीती आखणार असल्याचे सांगून सुवर्णपदक भारतच जिंकेल असे स्पष्ट केले आहे.    

आज झालेल्या सकाळच्या सत्रातील पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलं. भारताने संरक्षणासाठी श्रेयस राऊळ, बी. राजू व सुरेश सावंत यांना मैदानात उतरवले. श्रीलंकेचे खेळाडूंनी सर्वप्रथम श्रेयस राऊळचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि श्रेयस राऊळने उत्कृष्ट खेळाची झलक दाखवताना दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केलं त्याला श्रीलंकेच्या रनथंगाने सूर मारत बाद करताना प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या. त्यानंतर लंकेने बी. राजूचा पाठलाग सुरू केला. त्याने छान हुलकावण्या देत, साखळी पद्धतीने खेळत तब्बल तीन मिनिट तीस सेकंद वैयक्तिक वेळ नोंदवत बाद झाला. राजूलासुद्धा लंकेच्या रनथंगानेच बाद केले. त्यानंतर मात्र सुरेश सावंतला काही कमाल दाखवता आली नाही. लंकेच्या एम व्ही धनंजयने सुंदर सूर मारत अवघ्या वीस सेकंदात त्याला बाद केलं. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत अधिक पडझड होऊ दिली नाही मात्र तो शेवटची वीस सेकंद असताना सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर मात्र सागर पोद्दार नाबाद राहिला.

यानंतर भारताने केलेल्या आक्रमणात श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही मात्र भारताच्या अभिनंदन पाटीलने सात खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला तर श्रेयस राऊळने चार खेळाडूंना बाद केले तर सागर पोद्दार व दीपक माधवने प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करून भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशाची दारे उघडली. दुसऱ्या डावात भारताचा जगदेव सिंग एक मिनिट संरक्षण करून लवकर बाद झाला झाला. त्यानंतर मुनीर बाशाने किल्ला लढताना तीन मिनिटे संरक्षण करत श्रीलंकेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. मात्र तो श्रीलंकेच्या मधुशानकडून सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर भारताच्या एम. सिबीनने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करत भारताचा विजय सुकर केला त्याला उत्कृष्ट साथ देताना धानवीन खोपकरने दोन मिनिटे संरक्षण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 25-01 असा एक डाव चोवीस गुणांनी धुव्वा उडवत सहज अंतिम फेरी गाठली. या सामन्यात भारताच्या पोर्णिमा सकपाळने, कृष्णा यादव व निकिता पवार यां संरक्षणासाठी मैदानात उतरल्या त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी पूर्णिमा सकपाळचा पाठलाग करताना तिची दमछाक करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही खेळाडूला तिने दाद न देता तब्बल साडे चार मिनिटे संरक्षण करत भारताचा विजयी दावा मजबूत केला. त्यानंतर लंकेच्या खेळाडूंनी कृष्णा यादवचा पाठलाग सुरू केला मात्र तिने बहारदार संरक्षण करताना डावाच्या शेवटी म्हणजेच वैयक्तिक नाबाद साडेचार मिनीटांची वेळ नोंदवली.  यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणात काजल भोरने तब्बल सात खेळाडूंना बाद करून भारताचे विजयात मोठा वाटा उचलला व तिला उत्कृष्ट साथ देताना सस्मिता शर्मा, परवीन निशा , ऐश्वर्या सावंत व इशिता बिश्वास यांनी प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करून अंतिम फेरीत पोहोचले.

पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने नेपाळचा 24-23 (9-8,8-9 व 7-6) असा ज्यादा डावात एक मिनिट राखून एक गुणाने विजय साजरा केला. हा सामना बरोबरीत (17-17) सुटल्यामुळे जादा डाव खेळविण्यात आला व या डावात बांगलादेशने कमालीचा खेळ उंचावत 07-06  असा एक मिनिट राखून आपल्या अप्रतिम विजयाची नोंद केली व अंतिम फेरी गाठली.

तर महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान नेपाळने  बांगलादेशवर 07-06 असा एक डाव राखून एक गुणाने दणदणीत विजय साजरा करत अंतिम फेरी गाठली.

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारत