शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 19:43 IST

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला.

काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे सुरू आहेत. आज भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचे सामने सहज जिंकल्याने उद्या पुरुषांमध्ये भारत वि. बांगलादेश तर महिलांमध्ये भारत वि. नेपाळ अंतिम फेरीत लढत देणार आहेत. मुंबई व भारताचा आघाडीचा खेळाडू श्रेयस राऊळ याने उद्याच्या अंतिम सामन्यात आम्ही आक्रमक रणनीती आखणार असल्याचे सांगून सुवर्णपदक भारतच जिंकेल असे स्पष्ट केले आहे.    

आज झालेल्या सकाळच्या सत्रातील पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलं. भारताने संरक्षणासाठी श्रेयस राऊळ, बी. राजू व सुरेश सावंत यांना मैदानात उतरवले. श्रीलंकेचे खेळाडूंनी सर्वप्रथम श्रेयस राऊळचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि श्रेयस राऊळने उत्कृष्ट खेळाची झलक दाखवताना दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केलं त्याला श्रीलंकेच्या रनथंगाने सूर मारत बाद करताना प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या. त्यानंतर लंकेने बी. राजूचा पाठलाग सुरू केला. त्याने छान हुलकावण्या देत, साखळी पद्धतीने खेळत तब्बल तीन मिनिट तीस सेकंद वैयक्तिक वेळ नोंदवत बाद झाला. राजूलासुद्धा लंकेच्या रनथंगानेच बाद केले. त्यानंतर मात्र सुरेश सावंतला काही कमाल दाखवता आली नाही. लंकेच्या एम व्ही धनंजयने सुंदर सूर मारत अवघ्या वीस सेकंदात त्याला बाद केलं. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत अधिक पडझड होऊ दिली नाही मात्र तो शेवटची वीस सेकंद असताना सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर मात्र सागर पोद्दार नाबाद राहिला.

यानंतर भारताने केलेल्या आक्रमणात श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही मात्र भारताच्या अभिनंदन पाटीलने सात खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला तर श्रेयस राऊळने चार खेळाडूंना बाद केले तर सागर पोद्दार व दीपक माधवने प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करून भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशाची दारे उघडली. दुसऱ्या डावात भारताचा जगदेव सिंग एक मिनिट संरक्षण करून लवकर बाद झाला झाला. त्यानंतर मुनीर बाशाने किल्ला लढताना तीन मिनिटे संरक्षण करत श्रीलंकेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. मात्र तो श्रीलंकेच्या मधुशानकडून सहज स्पर्शाने बाद झाला. त्यानंतर भारताच्या एम. सिबीनने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण करत भारताचा विजय सुकर केला त्याला उत्कृष्ट साथ देताना धानवीन खोपकरने दोन मिनिटे संरक्षण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 25-01 असा एक डाव चोवीस गुणांनी धुव्वा उडवत सहज अंतिम फेरी गाठली. या सामन्यात भारताच्या पोर्णिमा सकपाळने, कृष्णा यादव व निकिता पवार यां संरक्षणासाठी मैदानात उतरल्या त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी पूर्णिमा सकपाळचा पाठलाग करताना तिची दमछाक करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही खेळाडूला तिने दाद न देता तब्बल साडे चार मिनिटे संरक्षण करत भारताचा विजयी दावा मजबूत केला. त्यानंतर लंकेच्या खेळाडूंनी कृष्णा यादवचा पाठलाग सुरू केला मात्र तिने बहारदार संरक्षण करताना डावाच्या शेवटी म्हणजेच वैयक्तिक नाबाद साडेचार मिनीटांची वेळ नोंदवली.  यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणात काजल भोरने तब्बल सात खेळाडूंना बाद करून भारताचे विजयात मोठा वाटा उचलला व तिला उत्कृष्ट साथ देताना सस्मिता शर्मा, परवीन निशा , ऐश्वर्या सावंत व इशिता बिश्वास यांनी प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करून अंतिम फेरीत पोहोचले.

पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने नेपाळचा 24-23 (9-8,8-9 व 7-6) असा ज्यादा डावात एक मिनिट राखून एक गुणाने विजय साजरा केला. हा सामना बरोबरीत (17-17) सुटल्यामुळे जादा डाव खेळविण्यात आला व या डावात बांगलादेशने कमालीचा खेळ उंचावत 07-06  असा एक मिनिट राखून आपल्या अप्रतिम विजयाची नोंद केली व अंतिम फेरी गाठली.

तर महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान नेपाळने  बांगलादेशवर 07-06 असा एक डाव राखून एक गुणाने दणदणीत विजय साजरा करत अंतिम फेरी गाठली.

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारत