शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भारताचा चीनला मोठा दणका! गलवान खोऱ्यातील कुरापतींनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:55 IST

चिनी आक्रमणाशी लढताना २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध काहीसे तणावपूर्ण आहेत. चीनने अनेकदा भारताच्या काही भूभागांवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळोवेळी भारतीय सैन्याने त्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. काही महिन्यांपूर्वी चिनी आणि भारतीय जवानांमध्ये गलवान खोऱ्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता भारताने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा दणका दिला आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympics) स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर भारतीय डिप्लोमॅट्सने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनने २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. गलवान खोऱ्यात चिनी जवानांचा मुकाबला करताना भारताचे २० जवान शहीद झाले होते. अशा वेळी हिवाळी ऑलिम्पिकमध्ये गलवान खोऱ्यात लढलेल्या सैनिकाला हा मान देणं हे अयोग्य असून काही अंशी भारताचा चिथावण्याचा प्रयत्न असल्याचं मान जात आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने आज डिप्लोमॅट्सबद्दलचा निर्णय जाहीर करताना चीनच्या या खेळीची निंदा केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चीनकडे यजमानपद असताना भारतीय डिप्लोमॅट्स महत्त्वाच्या दोन्ही समारंभांना हजर नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटतील असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.

"चीनने त्या सैनिकाला हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील बहुमान दिला असल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या आणि वाचल्या. चीनची ही खेळी खूपच खेदजनक आहे. हिवाळी ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धांना त्यांनी राजकीय रंग देणं योग्य नाही. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय डिप्लोमॅट्स बीजिंगच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत" असा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक