शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

भारताचा चीनला मोठा दणका! गलवान खोऱ्यातील कुरापतींनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:55 IST

चिनी आक्रमणाशी लढताना २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध काहीसे तणावपूर्ण आहेत. चीनने अनेकदा भारताच्या काही भूभागांवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळोवेळी भारतीय सैन्याने त्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. काही महिन्यांपूर्वी चिनी आणि भारतीय जवानांमध्ये गलवान खोऱ्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता भारताने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठा दणका दिला आहे. बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympics) स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर भारतीय डिप्लोमॅट्सने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनने २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. गलवान खोऱ्यात चिनी जवानांचा मुकाबला करताना भारताचे २० जवान शहीद झाले होते. अशा वेळी हिवाळी ऑलिम्पिकमध्ये गलवान खोऱ्यात लढलेल्या सैनिकाला हा मान देणं हे अयोग्य असून काही अंशी भारताचा चिथावण्याचा प्रयत्न असल्याचं मान जात आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने आज डिप्लोमॅट्सबद्दलचा निर्णय जाहीर करताना चीनच्या या खेळीची निंदा केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चीनकडे यजमानपद असताना भारतीय डिप्लोमॅट्स महत्त्वाच्या दोन्ही समारंभांना हजर नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटतील असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.

"चीनने त्या सैनिकाला हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील बहुमान दिला असल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या आणि वाचल्या. चीनची ही खेळी खूपच खेदजनक आहे. हिवाळी ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धांना त्यांनी राजकीय रंग देणं योग्य नाही. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय डिप्लोमॅट्स बीजिंगच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत" असा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक