भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

By Admin | Updated: November 20, 2015 03:31 IST2015-11-20T03:31:59+5:302015-11-20T03:31:59+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

BCCI to decide on India-Pak series soon: BCCI | भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

भारत-पाक मालिकेचा निर्णय लवकरच : बीसीसीआय

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होणार का? क्रिकेट चाहत्यांना या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या प्रमुखांदरम्यान याबाबत चर्चा झालेली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या प्रस्तावित मालिकेबाबत बोलताना सांगितले की,‘आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा.’
बीसीसीआयने पाकिस्तानला भारतात मालिकेसाठी आमंत्रित केले होते, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मायदेशातील मालिका युएईमध्ये खेळत आहे. त्यामुळे या मालिकेचे आयोजनही युएईमध्ये व्हायला हवे.
बीसीसीआयला युएईमध्ये खेळण्यास का रस नाही. २०१४ च्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईमध्ये खेळल्या गेले होते. याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले,‘द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट बोर्डांना स्थळाबाबत
निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आयसीसी किंवा आशियाई
क्रिकेट परिषदेच्या कुठल्याही आंतररष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्थळ
निश्चित करण्याचा अधिकार आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषदेला असतो. द्विपक्षीय मालिकेबाबतचा निर्णय उभय देशांच्या बोर्डांना घ्यावा लागतो. खेळताना कुठे सोयीस्कर होईल, त्यानुसार हा निर्णय घेतला जातो.’

Web Title: BCCI to decide on India-Pak series soon: BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.