शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CWG 2022:पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाला ठरला पहिला देश; जाणून घ्या भारताची स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:07 IST

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये १०० पदक जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला आहे.

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) ची खूप चर्चा रंगली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने अवघ्या क्रीडा विश्वाला आपलेसे केले आहे. मात्र यजमान देशातील खेळाडूंनाही मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक १०६ पदके जिंकली आहेत. तसेच यंदाच्या हंगामात पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आतापर्यंत सर्वाधिक ४२ सुवर्णपदक पटकावली आहेत. एवढेच नाही तर कांस्य पदक जिंकण्याच्या बाबतीत देखीला कांगारूचा देश अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण ३२ कांस्यपदक जिंकली आहेत. तर रौप्य पदकाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून देशाने आतापर्यंत एकूण ३२ रौप्य पदक मिळवली आहेत. 

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत यजमान इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. इंग्लिश खेळाडूंनी आतापर्यंत ३१ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २१ कांस्य यांसह एकूण ८६ पदक पटकावली आहेत. तर पदक जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंडने या हंगामात आतापर्यंत २६ पदकांवर आपले नाव कोरले आहे. यामध्ये १३ सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारत सहाव्या क्रमांकावर भारतीय खेळाडूंनी देखील आपली प्रतिभा दाखवत इंग्लंडच्या भूमीवर तिरंगा फडकावला आहे. भारताने आतापर्यंत एकूण १३ पदक जिंकली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर स्थित आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांची नोंद आहे. भारताला आतापर्यंत वेटलिफ्टिंगमधून सर्वाधिक सात पदक मिळाली आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगरने भारतासाठी रौप्य पदक जिंकून पदकाचे खाते उघडले होते. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाEnglandइंग्लंडNew Zealandन्यूझीलंडGold medalसुवर्ण पदकSilverचांदी