शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Asian Games 2018: सुवर्णपदक जिंकले, आता शर्यत 'खेल रत्न' पुरस्कारासाठी; बजरंग, विनेश आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:45 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे.

मुंबई - आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी रोमहर्षक विजय मिळवताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आशियाई स्पर्धेपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही दोघांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे, तर विनेशही लवकरच अर्ज करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे बजरंगने पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडतो, परंतु आशियाई स्पर्धेमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. 

''फेडरेशनतर्फे बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे आणि राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला तो मिळायलाच हवा. विनेश या अर्ज करणार आहे की नाही, याबाबत माहिती नाही. परंतु मंत्रालयाकडून तिच्या नावाचा विचार केला जाईल," अशी माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.  ते पुढे म्हणाले,"बजरंग आणि विनेश दोघेही या पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत."

बजरंगने 65 किलो वजनी गटात जपानच्या ताकातानी दैचीचा 11-8 असा पराभव केला. महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेशने जपानच्याच ईरीक युकीचा 6-2 असा पराभव केला. आशियाई स्पर्धेतील भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. 

हरयाणाच्या या दोन कुस्तीपटूंप्रमाणे भालाफेकपटू नीरज चोप्राही खेल रत्न पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आशियाई स्पर्धेत ध्वजधारक असलेल्या नीरजनेही नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना भारताला भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मिल्खा सिंग ( 1958) यांच्यानंतर आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.  25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाNeeraj Chopraनीरज चोप्राWrestlingकुस्ती