शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

 Asian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 03:36 IST

दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल.

मुंबई : दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. या आधी २०१४ मध्ये झालेल्या इंचियोन आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये ५४१ खेळाडूंचा समावेश होता. आतापर्यंत आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारताने १३९ सुवर्ण पदकांसह एकूण ६१६ पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, यातील ८२ सुवर्ण पदक १९८६ साली झालेल्या सेऊल आशियाई स्पर्धेपर्यंत जिंकले आहेत. यानंतर, भारताला केवळ ५७ सुवर्ण पटकावण्यात यश आले आहे. सुरुवातीच्या १० आशियाई स्पर्धा सत्रांच्या तुलनेत नंतरच्या ७ सत्रांमध्ये भारताच्या सुवर्ण पदकांमध्ये १८ % कमतरता आली आहे. त्याच वेळी, या दरम्यान खेळाडूंच्या सुविधांमध्ये मात्र कमालीची वाढ झाली. शिवाय, १९८६ सालानंतर भारताला एकदाही अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळेच यंदा भारतीय संघ ‘टॉप फाइव्ह’ ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या ४ आशियाई स्पर्धांवर नजर टाकल्यास दिसून येईल की, भारताने स्पर्धेसाठी पाठविलेल्या एकूण खेळाडूंच्या संख्येचा १०% एवढे पदके जिंकली आहेत. यानुसार, २००२ साली दक्षिण आफ्रिकेत (बुसान) झालेली स्पर्धा भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. त्या वेळी भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ३५ पदके जिंकत पदक तालिकेत आठवे स्थान पटकावले होते. एकूण विचार करता, १९९० साली बीजिंगमध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्या वेळी भारतीय संघ पदकतालिकेत अकराव्या स्थानी राहिला होता आणि केवळ एक सुवर्ण पदकासह एकूण २३ पदक जिंकण्यात यशस्वी ठरलेला.दोहा येथे १५व्या आशियाई स्पर्धेत भारताने २४ वर्षांनंतर पदकांचे अर्धशतक झळकावले होते. तेव्हा भारताने ५५० खेळाडूंचा संघ पाठविला होता. एकूण पदकांच्या बाबतीत भारताने २०१० साली ग्वांगझू आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत, गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले होते. तेव्हा भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ६५ पदके जिंकली होती. याहून अधिक पदके भारताने कोणत्याही आशियाई स्पर्धेत जिंकली नाहीत. २०१४ साली इंचियोन स्पर्धेतही भारताने ११ सुवर्णांसह एकूण ५७ पदक पटकावली होती.जकार्ताला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी यंदा भारत ६५-७० पदक जिंकण्यात यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. विशेष म्हणजे, आशिया स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व देशांंमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने चीननंतर भारताचा क्रमांक लागतो, परंतु असे असले, तरी स्पर्धेतील अव्वल पाच देशांमध्ये भारताचा क्रमांक येत नाही.यंदा भारतीय संघ मजबूत भासत असला, तरी मोठ्या प्रमाणात पदकांची लयलूट करण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. या आधी झालेल्या इंचियोन स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, टेनिस, कुस्ती, तिरंदाजी, कबड्डी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये ५७ पैकी ४३ पदक पटकावले होते.यंदा नेमबाजीत पदक पटकावण्याची भारताची शक्यता कमी मानली जाते. कारण या आधी ४४ स्पर्धा व्हायच्या व यंदा २० स्पर्धाच होतील. या आधी ज्या स्पर्धांमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती, त्या स्पर्धा यंदा होणार नसल्याने भारतीय नेमबाजांपुढे अडचणी आहेत. याचमुळे स्टार नेमबाज जीतू राय, गगन नारंग, मेहुली घोष आणि शाहजर रिझवी यांचा भारतीय संघात समावेश नाही.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Sportsक्रीडा