शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: धनुर्विद्येत थोडक्यात हुकल्या 'सुवर्ण'संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 14:08 IST

दोन सांघिक रौप्य, वैयक्तिक स्पर्धांत मात्र निराशा

ठळक मुद्देरजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

ललित झांबरे : जाकार्ता-पालेमबांग आशियाडमध्ये भारताने 15 सुवर्णपदक पटकावून आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली, पण धनुर्विद्येत नशिबाने साथ दिली असती तर सोळावे आणि कदाचित सतरावेसुध्दा सुवर्णपदक आपल्या नावे लागून आतापर्यंतची आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदली गेली असती परंतु, पुरुष आणि महिला, दोन्ही गटात सांघिक कम्पाउंड प्रकारात आपले सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकले. 

 बलाढ्य कोरियासोबतच्या सुवर्ण पदकाच्या लढती एवढ्या अटीतटीच्या झाल्या की एकवेळ भारतीय पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकल्याच्या बातम्यासुध्दा झाल्या होत्या परंतु पंचांनी पुन्हा एकदा टारगेटची पाहणी केली आणि गेल्यावेळी जिंकलेल्या सोन्याच्या जागी चांदीचे पदक हाती आले. 

रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांनीच चार वर्षांपूर्वी इंचिआन एशियन गेम्समध्ये कम्पाउंडचे सुवर्णपदक जिंकले होते. 

त्याच त्रिमूर्तीने यावेळी अंतिम फेरीत 229-227 अशी बाजी मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते परंतु, पंचांनी पुन्हा एकदा पाहणी केल्यावर कोरियाचे दोन नेम नऊच्या ऐवजी 10 गुणांच्या जागी लागलेले असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे लढत 229-229 अशी बरोबरीवर आली. म्हणून मग शूटआऊट फेरी घेतली गेली.

 तोडीस तोड स्पर्धा बघा,  त्यातही स्कोअर 29-29 बरोबरीवर राहिला म्हणून मग ज्यांनी परफेक्ट टेन शॉट अधिक मारले तो विजेता या नियमाचा आधार घेतला गेला आणि कोरियाने बाजी मारली तर  चौहान, सैनी व वर्माच्या टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

पुरुषांप्रमाणेच ज्योती सुरेखा वेन्नम, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांच्या संघानेही अंतिम फेरी गाठली. यादरम्यान फिलिपीन्स व तैवानसारख्या तगड्या संघांना त्यांनी मात दिली. अंतिम फेरीतही त्यांनी बलाढ्य कोरियाला दिलेली झुंज कौतुकास्पद होती पण, शेवटी 231- 228 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकच हाती लागले. मधुमिता व मुस्कान या शेवटी-शेवटी परफेक्ट टेन करु न शकल्याने ही सुवर्णसंधी हुकली. 

कम्पाउड संघाची ही कामगिरी वगळता रिकर्व आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये मात्र आपल्या तिरंदाजांनी निराशा केली. पदकाची आशा असलेली दीपिका कुमारी पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेत ढेपाळली. अतानु दासनेही निराशा केली. 

त्यामुळे चार वर्षांपूर्वी धनुर्विद्येत आपली जी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्यपदकाची कमाई होती ती यावेळी फक्त दोन रौप्यपदकांपूरतीच मर्यादीत राहिली.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाIndiaभारत