शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: राहीसाठी ही विक्रमी कामगिरी महत्त्वाची - पवन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:54 IST

महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुणे : महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे राहीचा आत्मविश्वास वाढणार असून, तो तिला आगामी काळात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद आणि जागतिक स्पर्धेसाठी उपयोगात येणार असल्याचे मत ‘रायफल असोसिएशन आॅफ इंडिया’चे सह सरचिटणीस जनरल पवन सिंग यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.पवन म्हणाले की, ‘राहीने ज्या २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकले आहे, अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही महिला नेमबाजपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली नाही. आज राहीने जी कामगिरी केली तिला तोड नाही. गेले दोन वर्षे राही दुखापतीवर उपचार घेत होती. जर्मनीच्या मुंबीयार या महिला मार्गदर्शकांकडे ती सराव करीत असून, त्यांनी तिच्या दुखापतीवर योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी तिला खूप साहाय्य केले आहे.राहीचा आत्मविश्वास आणि तिची एकाग्रता यासाठी त्यांनी तिच्याकडून योग्य ते व्यायाम प्रकार आणि योगसाधना करून घेतली आहे.’ राहीच्या पुढील स्पर्धांविषयी पवन म्हणाले, ‘आगामी काळात कोरिया येथे होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०१९मध्ये प्रथमच होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हे सुवर्णपदक राहीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या आॅलिम्पिक कोटा स्पर्धा असतील. राहीने आज ५८० गुणांची कामगिरी केली आहे आणि आयएसएसएफच्या आतापर्यंतच्या पात्रता आलेखानुसार राहीच्या शूटिंग प्रकारासाठी अंदाजे ५८४ ते ८५५ गुणांची पात्रता असते. राही या वाढलेल्या आत्मविश्वासाने ही पात्रता नक्कीच गाठू शकणार आहे. तिच्या प्रकारात प्रिसिजन शूटिंग आणि रॅपिड फायर (ड्युलिंग) असे मिळून गुण ग्राह्य धरले जातात.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा