शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Asian Games 2018: ...अन्यथा ऑलिम्पिकमधून कुस्तीपटू रित्या हाताने परततील!

By प्रसाद लाड | Updated: September 2, 2018 12:01 IST

Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता.

- प्रसाद लाडइंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. पण भारताला पहिलाच धक्का सुशील कुमारच्या रुपात बसला आणि भारतीयांच्या आशा मावळल्या.आशियाई स्पर्धेपूर्वी सुशीलच्या नावाचा चांगलाच दबदबा होता. या स्पर्धेपूर्वी तो एक लढत हरला होता. भारताबाहेर सराव करत असल्याने त्याचा खेळ चांगलाच बहरला असेल, असे वाटत होते. पण सुशीलच्या नावाचा फुगा पहिल्याच लढतीत फुटला. हा भारतासाठी मोठा धक्का होता.साक्षी मलिक. ऑलिम्पिक पदक विजेती. आशियाई स्पर्धेत ती सुवर्णपदक पटकावणार, असा अतिआत्मविश्वास बऱ्याच जणांना होता. साक्षीने सुरुवातीला चांगली लढत दिली खरी, पण तिला कामगिरीत यश राखता आले नाही. त्यामुळे भारताला अजून एका पदकाला मुकावे लागले.भारताला सुवर्णपदकाची बोहनी करून दिली ती कुस्तीनेच. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. त्यानंतर विनेश फोगटने भारताला सुवर्ण यश मिळवून दिले. पण त्यानंतर मात्र भारतीय कुस्तीमध्ये सोनेरी दिवस उगवला नाही. कारण त्यानंतर भारतीय कुस्तीपटूंनी एकामागोमाग पराभवाचाच पाढा वाचला. दिव्या काकरानने भारताला कांस्यपदक जिंकवून दिले खरे, पण एकंदरीत कुस्तीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.

आता भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक असेल. त्यासाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. पण आतापासूनच योग्य पावले उचलली तर ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीमध्ये चांगली कामगिरी दिसू शकते. त्यासाठी काहीव कडक पावलेही उचलायला हवीत, अन्यथा ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रीत्या हाताने भारताला परतावे लागेल.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाWrestlingकुस्ती