शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Asian Games 2018: सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी 'तो' मनावर दगड ठेवून लढतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 09:59 IST

Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले.

मुंबई - 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. त्याशिवाय जलतरणपटू साजन प्रकाशने 200 मीटर बटरल्फाय प्रकारात अंतिम फेरा गाठून भारतीयांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. 

आशियाई स्पर्धेत 32 वर्षांत भारतीय जलतरणपटूने अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पण, त्याचे कुटुंबीय केरळमध्ये आलेल्या पूरात अडकले आहेत आणि अशा परिस्थितीतही तो देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील या 24 वर्षीय खेळाडूला येथील परिस्थितीची फारशी कल्पना नाही. त्याचे घर हे पेरियार धरणानजीकच आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणानजीकचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. "माझे कुटुंबीय कुठे आहेत? कसे आहेत? याची काहीच कल्पना नाही. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, इतकेच मला माहित आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो,"असे साजनने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

1986नंतर आशियाई स्पर्धेत जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिलाच भारतीय आहे. 1986 साली खजान सिंग यांनी अंतिम फेरी गाठली होती. केरळ पुरग्रस्तांसाठी साजनने काही आशियाई स्पर्धेच्या आदल्या दिवशी मदतीची मागणी केली होती.  त्याने अभिनेता सिद्धार्थ याचा मॅसेज रिट्वीट केला होता.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा