शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सची तिसरी सर्वोत्तम कामगिरी, सुवर्णपदकांचा पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 09:24 IST

Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले. भारतीय अॅथलेटिक्सपटूंची ही आशियाई स्पर्धेतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारतीय अॅथलेटिक्सपटूंनी 1951 मध्ये 34 ( 10 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य) आणि 1982 मध्ये 21 (4 सुवर्ण, 9 रौप्य व 8 कांस्य)  पदकांची कमाई केली होती आणि या दोन्ही स्पर्धा नवी दिल्ली येथे झाल्या होत्या. त्यामुळे जकार्तात भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी ही परदेशातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 

भालाफेकीतील पहिलेच सुवर्णनीरज चोप्राने ( 88.06 मीटर) आशियाई स्पर्धेत भारताला भालाफेकीतील पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. 1982 मध्ये भारताच्या गुरतेज सिंग यांना कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले होते. 

1952 नंतर पहिल्यांदाच सुवर्ण दौडजिन्सन जॉन्सनने ( 3:44.72 से.) 1500 मीटर शर्यतीत जिंकलेले सुवर्ण हे 1952नंतरचे या क्रीडा प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे. निक्का सिंग यांनी 1952च्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 1998 च्या स्पर्धेनंतर 1500 मीटरमध्ये पदक जिंकणारा जॉन्सन हा पहिलाच खेळाडू आहे.

उषाच्या पावलावर द्युतीची वाटचालपी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युती चंदने पटकावला. द्युतीने दोन्ही प्रकारात रौप्यपदक नावावर केले. 

मनजिंत सिंगने सर्वांना धक्का दिलामनजित सिंगने ( 1:46.15 मी.) भारताचा आशियाई स्पर्धेतील 800 मीटर शर्यतीतील सुवर्ण दुष्काळ संपवला. 1982च्या आशियाई स्पर्धेत चार्ल्स बोरोमेओ यांनी 800 मीटरचे सुवर्ण जिंकले होते. 

बर्मनची स्वप्नपूर्तीहेप्टॉथ्लॉन स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरली. यापूर्वी सोना बिस्वास ( रौप्य ) आणि जेजे सोभा ( कांस्य ) यांनी 2002 मध्ये, तर प्रमिला अयप्पा ( कांस्य) यांनी 2010 मध्ये पदक जिंकले होते. 

 पाचपैकी पाचभारताच्या महिला धावपटूंनी 4 बाय 400 मीटर शर्यतीत सलग पाचवे सुवर्णपदक नावावर केले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावाव केले. हिमा आणि पुवम्मा यांचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी हिमाने 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर पुवम्माने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले संघाचे रौप्य जिंकले होते. 

तूर डी जकार्ताभारताचा गोळाफेकपटू तेजिंदर पाल तूरने जकार्तात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 2002 नंतर भारताला आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीचे पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHima Dasहिमा दासDutee Chandद्युती चंद