शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:09 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील.

- अंजली भागवतआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा आशियाई स्पर्धा खूप कठीण असणार आहे. कारण, आॅलिम्पिकमधील बहुतांश पदकविजेते आशियातूनच आहेत. पदकं जिंकण्याबद्दल बोलायचं झालं तर, ते त्या दिवसावर व परिस्थितीवर अवलंबून असणार. काहीवेळा दुर्दैवाने अत्यंत कमी मार्जिनद्वारे शॉट चुकू शकतो आणि पदकसुद्धा निसटते. मिश्र संघ नेमबाजी प्रकार उत्साहवर्धक वातावरण आहे आणि भारतीय नेमबाजांनी तिथे पदक जिंकण्याची चांगली संभावना आहे. भारतीय महिला नेमबाज हीना सिध्दू, मनू भाकर, श्रेयशी सिंग, अपूर्वी चंदेला यांच्याकडून उत्तम कामगिरी पाहण्यास नक्कीच मिळेल. राही सरनोबतसुद्धा पुनरागमन करीत आहे आणि पदक जिंकण्यात सक्षम आहे. तरुण नेमबाजांनी मुक्त मनाने व कुठलेही दडपण न घेता लक्ष साधावे लागणार आहे तरच यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीनंतर, आता सर्व लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागले आहे. भारतीय नेमबाज आपला ठसा उमटवीत असले, तरीही आशियाई क्रीडामध्ये आव्हान कठीण असणार आहे. चीनने नेमबाजीमध्ये १९७ सुवर्णपदकांसह एकूण ३९५ पदकं जिंकली आहेत. दक्षिण कोरिया २४३ पदकांसह दुसऱ्या, तर जपान १५१ पदकांसह तिसºया स्थानावर आहे. भारतीय नेमबाजांनी गत आशियाई स्पर्धेपर्यंत केवळ ७ सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा किती खडतर आहे, हे भारताच्या पदक संख्येवरून कळून येते. भारताची ताकद असलेले शूटिंगचे टीम इव्हेंट दुर्दैवाने या आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. या वेळी फक्त २० आहेत. मिश्र संघांचे १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर पिस्तूल आणि ट्रॅप अशा तीन स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहेत. एकाच देशाकडून केवळ दोन नेमबाज प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात, त्यामुळे भारतीय नेमबाजांची निवड खूप अवघड होती.अनुभवी नेमबाजांकडून पदकांची अपेक्षातीन आशियाई क्रीडा पदक जिंकणारा संजीव राजपूत आपल्या चौथ्या पदकासाठी उत्सुक दिसत आहे. ३७ वर्षीय संजीव आपल्या चौथ्या आशियाई क्रीडामध्ये आवडता ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये स्पर्धा करेल. १० मीटर एअर रायफल स्पर्धा भारतासाठी खूप प्रतिष्ठितची आहे. बिंद्राने निवृत्ती घेतल्यामुळे आणि नारंगच्या अनुपस्थितीमुळे रवी कुमार आणि दीपक कुमार यांना उत्तम संधी लाभली आहे. ४२ वर्षांचा मानवजीत सिंग संधूही ट्रॅप स्पर्धेत या वेळीसुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही त्याची सहावी आशियाई स्पर्धा असणार आहे, या अनुभवी खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत आणि कदाचित आपल्या अनुभवाच्या जोरावर सहावे पदक जिंकेल.तरुण क्रांतीगेले ते दिवस जेव्हा खेळाडूंना वयाच्या विसाव्या वर्षांनंतरच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येईल. आपले तरुण खेळाडू निर्भय, झटपट प्रतिक्षेप आणि आपल्या खेळाच्या बाबतीत खूप एकाग्र आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, ते आपल्या खेळाचा आनंद घेतात आणि म्हणूनच पदके जिंकतात. बºयाच  तरुण खेळाडूंसाठी ही पहिली आशियाई स्पर्धा असेल. पदकांची अपेक्षा करणे कदाचित चुकीचे; परंतु दबाव नसल्यामुळे ते उत्तम कामगिरी दर्शवतील. १५ वर्षांचा अनीश भानवाला, २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तो आशियाई स्पर्धेतसुद्धा उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्ड कप आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी मनू भाकरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एल्व्हिनिल व्हॅलेरिव्हन हीदेखील पहिल्यांदाच सीनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे, तरीसुद्धा तिच्याकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे.(शब्दांकन : अभिजित देशमुख

टॅग्स :ShootingगोळीबारAsian Games 2018एशियन गेम्स २०१८