शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:09 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील.

- अंजली भागवतआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा आशियाई स्पर्धा खूप कठीण असणार आहे. कारण, आॅलिम्पिकमधील बहुतांश पदकविजेते आशियातूनच आहेत. पदकं जिंकण्याबद्दल बोलायचं झालं तर, ते त्या दिवसावर व परिस्थितीवर अवलंबून असणार. काहीवेळा दुर्दैवाने अत्यंत कमी मार्जिनद्वारे शॉट चुकू शकतो आणि पदकसुद्धा निसटते. मिश्र संघ नेमबाजी प्रकार उत्साहवर्धक वातावरण आहे आणि भारतीय नेमबाजांनी तिथे पदक जिंकण्याची चांगली संभावना आहे. भारतीय महिला नेमबाज हीना सिध्दू, मनू भाकर, श्रेयशी सिंग, अपूर्वी चंदेला यांच्याकडून उत्तम कामगिरी पाहण्यास नक्कीच मिळेल. राही सरनोबतसुद्धा पुनरागमन करीत आहे आणि पदक जिंकण्यात सक्षम आहे. तरुण नेमबाजांनी मुक्त मनाने व कुठलेही दडपण न घेता लक्ष साधावे लागणार आहे तरच यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीनंतर, आता सर्व लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागले आहे. भारतीय नेमबाज आपला ठसा उमटवीत असले, तरीही आशियाई क्रीडामध्ये आव्हान कठीण असणार आहे. चीनने नेमबाजीमध्ये १९७ सुवर्णपदकांसह एकूण ३९५ पदकं जिंकली आहेत. दक्षिण कोरिया २४३ पदकांसह दुसऱ्या, तर जपान १५१ पदकांसह तिसºया स्थानावर आहे. भारतीय नेमबाजांनी गत आशियाई स्पर्धेपर्यंत केवळ ७ सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा किती खडतर आहे, हे भारताच्या पदक संख्येवरून कळून येते. भारताची ताकद असलेले शूटिंगचे टीम इव्हेंट दुर्दैवाने या आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. या वेळी फक्त २० आहेत. मिश्र संघांचे १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर पिस्तूल आणि ट्रॅप अशा तीन स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहेत. एकाच देशाकडून केवळ दोन नेमबाज प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात, त्यामुळे भारतीय नेमबाजांची निवड खूप अवघड होती.अनुभवी नेमबाजांकडून पदकांची अपेक्षातीन आशियाई क्रीडा पदक जिंकणारा संजीव राजपूत आपल्या चौथ्या पदकासाठी उत्सुक दिसत आहे. ३७ वर्षीय संजीव आपल्या चौथ्या आशियाई क्रीडामध्ये आवडता ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये स्पर्धा करेल. १० मीटर एअर रायफल स्पर्धा भारतासाठी खूप प्रतिष्ठितची आहे. बिंद्राने निवृत्ती घेतल्यामुळे आणि नारंगच्या अनुपस्थितीमुळे रवी कुमार आणि दीपक कुमार यांना उत्तम संधी लाभली आहे. ४२ वर्षांचा मानवजीत सिंग संधूही ट्रॅप स्पर्धेत या वेळीसुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही त्याची सहावी आशियाई स्पर्धा असणार आहे, या अनुभवी खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत आणि कदाचित आपल्या अनुभवाच्या जोरावर सहावे पदक जिंकेल.तरुण क्रांतीगेले ते दिवस जेव्हा खेळाडूंना वयाच्या विसाव्या वर्षांनंतरच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येईल. आपले तरुण खेळाडू निर्भय, झटपट प्रतिक्षेप आणि आपल्या खेळाच्या बाबतीत खूप एकाग्र आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, ते आपल्या खेळाचा आनंद घेतात आणि म्हणूनच पदके जिंकतात. बºयाच  तरुण खेळाडूंसाठी ही पहिली आशियाई स्पर्धा असेल. पदकांची अपेक्षा करणे कदाचित चुकीचे; परंतु दबाव नसल्यामुळे ते उत्तम कामगिरी दर्शवतील. १५ वर्षांचा अनीश भानवाला, २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तो आशियाई स्पर्धेतसुद्धा उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्ड कप आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी मनू भाकरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एल्व्हिनिल व्हॅलेरिव्हन हीदेखील पहिल्यांदाच सीनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे, तरीसुद्धा तिच्याकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे.(शब्दांकन : अभिजित देशमुख

टॅग्स :ShootingगोळीबारAsian Games 2018एशियन गेम्स २०१८