शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Asian Game 2018: राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:58 IST

Asian Games 2018: विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे.

मुंबई - विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने जकार्ता स्पर्धेतून माघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. मीराबाईच्या पाठीच्या खालच्या भागात मे महिन्यात दुखणे उमळले होते. ही समस्या कायम असून वजन उचलण्याचा सराव करताना त्रास होत आहे. मागच्या आठवड्यात दुखणे बरे वाटू लागताच मीराबाईने मुंबईत सरावाला सुरूवात केली होती. मात्र कालपासून पुन्हा दुखण्याने उचल खाल्ली. विजय म्हणाले,‘मी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन १ नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही.’दरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या ४८ किलो गटात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकाले होते.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूSportsक्रीडा