शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

By admin | Updated: March 4, 2015 23:59 IST

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते.

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते. खेळपट्टीचा इतिहास बघितल्यानंतर ही भीती स्वाभाविक होती, पण त्यानंतर वेस्ट इंडीज संघ मैदानावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता तर या संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करावा की नको, असा प्रश्न पडतो. विंडीजने पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि याची मला कल्पना आहे, तरी विंडीजच्या तुलनेत भारत अधिक मजबूत संघ आहे. तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या तुलनेत विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ वेगळा भासत आहे. धवनला सूर गवसला, हे याचे कारण असू शकते, पण त्यापेक्षा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी लय सापडली आहे. यूएईविरुद्धच्या सामन्याच्या निकालावरून आकलन करणे चुकीचे असले, तरी त्या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विंडीजविरुद्धच्या लढतीत उमेश यादव व मोहम्मद शमी सुरुवातीला बळी घेण्यात यशस्वी ठरले, तर विंडीज संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसेल. विंडीज संघाचे तळाचे फलंदाज धोकादायक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर सिमन्स, सॅमी, रसेल व होल्डर यांना नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाचा मार्ग खडतर होणे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ख्रिस गेलला लवकर बाद करणे महत्त्वाचे आहे. या लढतीत भारतीय फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीची संधी मिळाली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. भारतीय फिरकीपटू येथे कमाल करू शकतात. कारण, अश्विन जबरदस्त फॉर्मात असून, कठीण प्रसंगी गोलंदाजी करणे त्याला आवडते. आयपीएलमध्ये गेलविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पर्थमध्ये यूएईविरुद्ध खेळणे फायद्याचे ठरले. त्या लढतीत रोहित शर्माला सूर गवसला. रोहितला क्रिकेटजगतात दिग्गज फलंदाज मानले जाते. जर, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर विंडीज संघाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणे निश्चित आहे. कारण विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू आता पूर्वीप्रमाणे दमदार नाही. सॅमी व रसेल यांनाही या संघांत १०-१० षटके गोलंदाजी करावी लागते, यावरून त्याची कल्पना येते. उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीपासून भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल; पण विंडीज संघाची गोलंदाजी भारतीय संघाची झोप उडवणारी नाही, हे मात्र नक्की. भारताच्या दृष्टीने विचार करता या सामन्यांचा सर्वोत्तम निकाल म्हणजे विजय असेल. टीम इंडिया या लढतीत गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. या लढतीच्या निमित्ताने टीम इंडियाला बाद फेरीची तयारी करण्याची चांगली संधी लाभली आहे. (टीसीएम)