शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

By admin | Updated: March 4, 2015 23:59 IST

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते.

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते. खेळपट्टीचा इतिहास बघितल्यानंतर ही भीती स्वाभाविक होती, पण त्यानंतर वेस्ट इंडीज संघ मैदानावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता तर या संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करावा की नको, असा प्रश्न पडतो. विंडीजने पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि याची मला कल्पना आहे, तरी विंडीजच्या तुलनेत भारत अधिक मजबूत संघ आहे. तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या तुलनेत विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ वेगळा भासत आहे. धवनला सूर गवसला, हे याचे कारण असू शकते, पण त्यापेक्षा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी लय सापडली आहे. यूएईविरुद्धच्या सामन्याच्या निकालावरून आकलन करणे चुकीचे असले, तरी त्या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विंडीजविरुद्धच्या लढतीत उमेश यादव व मोहम्मद शमी सुरुवातीला बळी घेण्यात यशस्वी ठरले, तर विंडीज संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसेल. विंडीज संघाचे तळाचे फलंदाज धोकादायक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर सिमन्स, सॅमी, रसेल व होल्डर यांना नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाचा मार्ग खडतर होणे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ख्रिस गेलला लवकर बाद करणे महत्त्वाचे आहे. या लढतीत भारतीय फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीची संधी मिळाली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. भारतीय फिरकीपटू येथे कमाल करू शकतात. कारण, अश्विन जबरदस्त फॉर्मात असून, कठीण प्रसंगी गोलंदाजी करणे त्याला आवडते. आयपीएलमध्ये गेलविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पर्थमध्ये यूएईविरुद्ध खेळणे फायद्याचे ठरले. त्या लढतीत रोहित शर्माला सूर गवसला. रोहितला क्रिकेटजगतात दिग्गज फलंदाज मानले जाते. जर, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर विंडीज संघाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणे निश्चित आहे. कारण विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू आता पूर्वीप्रमाणे दमदार नाही. सॅमी व रसेल यांनाही या संघांत १०-१० षटके गोलंदाजी करावी लागते, यावरून त्याची कल्पना येते. उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीपासून भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल; पण विंडीज संघाची गोलंदाजी भारतीय संघाची झोप उडवणारी नाही, हे मात्र नक्की. भारताच्या दृष्टीने विचार करता या सामन्यांचा सर्वोत्तम निकाल म्हणजे विजय असेल. टीम इंडिया या लढतीत गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. या लढतीच्या निमित्ताने टीम इंडियाला बाद फेरीची तयारी करण्याची चांगली संधी लाभली आहे. (टीसीएम)