शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

By admin | Updated: March 4, 2015 23:59 IST

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते.

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते. खेळपट्टीचा इतिहास बघितल्यानंतर ही भीती स्वाभाविक होती, पण त्यानंतर वेस्ट इंडीज संघ मैदानावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता तर या संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करावा की नको, असा प्रश्न पडतो. विंडीजने पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि याची मला कल्पना आहे, तरी विंडीजच्या तुलनेत भारत अधिक मजबूत संघ आहे. तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या तुलनेत विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ वेगळा भासत आहे. धवनला सूर गवसला, हे याचे कारण असू शकते, पण त्यापेक्षा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी लय सापडली आहे. यूएईविरुद्धच्या सामन्याच्या निकालावरून आकलन करणे चुकीचे असले, तरी त्या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विंडीजविरुद्धच्या लढतीत उमेश यादव व मोहम्मद शमी सुरुवातीला बळी घेण्यात यशस्वी ठरले, तर विंडीज संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसेल. विंडीज संघाचे तळाचे फलंदाज धोकादायक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर सिमन्स, सॅमी, रसेल व होल्डर यांना नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाचा मार्ग खडतर होणे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ख्रिस गेलला लवकर बाद करणे महत्त्वाचे आहे. या लढतीत भारतीय फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीची संधी मिळाली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. भारतीय फिरकीपटू येथे कमाल करू शकतात. कारण, अश्विन जबरदस्त फॉर्मात असून, कठीण प्रसंगी गोलंदाजी करणे त्याला आवडते. आयपीएलमध्ये गेलविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पर्थमध्ये यूएईविरुद्ध खेळणे फायद्याचे ठरले. त्या लढतीत रोहित शर्माला सूर गवसला. रोहितला क्रिकेटजगतात दिग्गज फलंदाज मानले जाते. जर, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर विंडीज संघाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणे निश्चित आहे. कारण विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू आता पूर्वीप्रमाणे दमदार नाही. सॅमी व रसेल यांनाही या संघांत १०-१० षटके गोलंदाजी करावी लागते, यावरून त्याची कल्पना येते. उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीपासून भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल; पण विंडीज संघाची गोलंदाजी भारतीय संघाची झोप उडवणारी नाही, हे मात्र नक्की. भारताच्या दृष्टीने विचार करता या सामन्यांचा सर्वोत्तम निकाल म्हणजे विजय असेल. टीम इंडिया या लढतीत गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. या लढतीच्या निमित्ताने टीम इंडियाला बाद फेरीची तयारी करण्याची चांगली संधी लाभली आहे. (टीसीएम)