शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एक किडनी, स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत; अशा परिस्थितीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:54 IST

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिले आहे. अंजूला तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने पदकावर नाव कोरले होते.

Anju Bobby George: भारताचा गोल्डन बॉय, म्हणजेच नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी (27 ऑगस्ट) नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. नीरजने 88.17 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. पाकिस्तानचा अर्शद नदीम दुसरा आणि जेकोब वडलेच (चेक प्रजासत्ताक) तिसरा आला.

नीरज चोप्रा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत नीरजने रौप्यपदक जिंकले होते. नीरज व्यतिरिक्त लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज ही जागतिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकू शकली आहे. अंजू बॉबी जॉर्जने 2003 पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या लांब उडी स्पर्धेत 6.70 मीटरची उडी मारुन कांस्यपदक जिंकले होते. तिच्यानंतर 19 वर्षांनंतर नीरज चोप्राने भारतासाठी पदकाचा दुष्काळ संपवला.

अडचणींनी भरलेला होता अंजूचा प्रवास अंजू बॉबी जॉर्जला तिच्या सरावाच्या दिवसांमध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने यश संपादन केले होते. विशेष म्हणजे, तिला पेन किलर औषधांचीही अॅलर्जी होती. असे असूनही तिने हिंमत सोडली नाही. अंजूने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

अंजूने ट्विट केले होते की, 'विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मी त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे, जिने एका किडनीच्या मदतीने सर्वोच्च स्तर गाठले. मला पेन किलर औषधांची ऍलर्जी होती, शर्यतीच्या सुरुवातीला माझा पुढचा पाय बरोबर काम करत नव्हता. अशा परिस्थितीत मी यश मिळवले. याला आपण प्रशिक्षकाची जादू म्हणू शकतो की त्याच्या प्रतिभेची.'

कोण आहे अंजू बॉबी जॉर्जकेरळमधील कोट्टायम येथे जन्मलेल्या अंजू बॉबी जॉर्जने 1996 मध्ये दिल्ली येथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर 1999 मध्ये अंजूने नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्समध्ये रौप्यपदकाचा राष्ट्रीय विक्रम केला. 2003 च्या आफ्रो-एशियन गेम्समध्येही तिने सुवर्णपदक जिंकले होते. अंजूने IAAF वर्ल्ड अॅथलेटिक्स फायनल्स (मोनॅको 2005) मध्येही सुवर्णपदक जिंकले. 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंजूने तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या रॉबर्ट बॉबी जॉर्जसोबत लग्न केले आहे. 

टॅग्स :IndiaभारतKeralaकेरळWomenमहिलाNeeraj Chopraनीरज चोप्रा