पावसाच्या व्यत्ययानंतर भारत- बांग्लादेश सामना पुन्हा सुरू

By Admin | Updated: June 17, 2014 16:37 IST2014-06-17T13:40:35+5:302014-06-17T16:37:42+5:30

पावसाच्या व्यत्ययानंतर भार-बांग्लादेशमधील दुसरा एकदिवसीय सामना पुन्हा सुरू झाला असून आता हा सामना ४१ षटकांचाच खेळवला जाणार आहेे.

After rain interruption, India-Bangladesh match again | पावसाच्या व्यत्ययानंतर भारत- बांग्लादेश सामना पुन्हा सुरू

पावसाच्या व्यत्ययानंतर भारत- बांग्लादेश सामना पुन्हा सुरू

 ऑनलाइन टीम

ढाका, दि. १७ - पावसाच्या व्यत्ययानंतर भार-बांग्लादेशमधील दुसरा एकदिवसीय सामना पुन्हा सुरू झाला असून आता हा सामना ४१ षटकांचाच खेळवला जाणार आहेे. भारताने ४ गडी गमावत ६५ धावा केल्या आहेत.

दुस-या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशने भारताला सुरुवातीलाच धक्का दिला. सलामीवीर अजिंक्य रहाणे भोपळा न फोडता तंबूत परतला.  पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताने पाच षटकात एक विकेटच्या मोबदल्यात १४ धावा केल्या होत्या. 

सहारा कपमधील दुस-या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मुश्फिकर रहीमचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. बांग्लादेशचा गोलंदाज मोर्तझाने अजिंक्य रहाणेला शून्यावर बाद करुन माघारी पाठवले. सध्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा (नाबाद ३) आणि रॉबिन उथप्पा (नाबाद ६) ही जोडी खेळत आहे. 

सुरैश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांग्लादेश दौ-यावर असून या दौ-यात महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली व अन्य वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यात दौ-यात भारतीय संघात नवख्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. 

Web Title: After rain interruption, India-Bangladesh match again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.