शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

१८९ माडियांना मिळणार हक्काचे घर

By admin | Updated: September 17, 2014 23:47 IST

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आयुक्त कार्यालयाकडे पाठविलेल्या शबरी आदिवासी घरकूल योजनेच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील

स्वदेश घाणोकर - मुंबई
गेले दीड-एक वर्ष आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग न घेता आल्याने भारतीय बॉक्सर्सच्या मनगटात आलेली मरगळ दूर करणारी बातमी मंगळवारी धडकली. बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) बॉक्सर्सना आशियाई स्पर्धामध्ये राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आणि भारतीय बॉक्सिंगला नवचैतन्य मिळाले. हीच शिदोरी सोबत घेत भारतीय बॉक्सर्स आशियाई स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करतील, असा विश्वास बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कवळी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. 
एआयबीएच्या या निर्णयाने आम्हा बॉक्सर्सना खूप आनंद झाला आहे. गेल्या दीड वर्षाच्या बंदीने जणू भारतातील बॉक्सिंग संपुष्टात येते की काय, असे वाटू लागले होते. मात्र हा निर्णय आशियाई स्पध्रेत चांगली कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असेही कवळी म्हणाले. एआयबीएच्या मान्यतेनंतर पुढचे पाऊल काय असेल यावर कवळी म्हणाले, की आता आम्हाला सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता मिळवायची आहे. एआयबीएने हिरवा कंदील दाखविल्यानंतर यात काही अडचण येईल असे वाटत नाही. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण करू. 
पुढील वाटचालीबद्दल विचारता ते म्हणाले, की सध्या तरी आम्ही बॉक्सर्ससाठी ‘चला उठा, कामाला लागा, झाले गेले विसरा’ असा सकारात्मक संदेश देण्यासाठी जास्तीत जास्त राष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनांवर भर देणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात रायपूरला स्पर्धा होणार आहे. त्याच वेळी संघटनेच्या सर्व पदाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून, त्यात पुढील वाटचाल ठरविण्यात येईल. 
भारतीय हौशी मुष्टियुद्ध संघात (आयएबीएफ) गटबाजीमुळे अनेक वाद होत होते आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका बॉक्सर्सना सोसावा लागला. या सर्व गटबाजीतून सुवर्णमध्य काढत पुन्हा नवी संघटना स्थापन करणो कितपत आव्हानात्मक होते, या प्रश्नावर त्यांनी सोपे उत्तर दिले. ते म्हणाले, हे काम सोपे नव्हते, पण तितके कठीणही नव्हते. हे खरे आहे की, संघटना गटांत विभागली गेली होती आणि त्यामुळे येथे चिखल साचला होता. तो साफ करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, असे सतत वाटत होते. त्यामुळेच या गटांत समेट घडवला आणि बॉक्सिंग इंडियाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. यापुढे हे गट हेवेदावे विसरून सोबत राहतील.  
 
पहिला विचार भारताचा..
बॉक्सिंग इंडिया संघटनेवर तुमच्या रूपाने एक मुंबईकर चेहरा मिळाला आहे आणि त्याचा फायदा  मुंबईच्या खेळाडूंना मिळेल, या विचाराला कवळी यांनी छेद दिला. ते म्हणाले, मी राष्ट्रीय संघटनेवर आहे आणि प्रथम भारताचा विचार करेन. राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग सुधारली, तर नक्कीच प्रत्येक राज्यातील आणि मुंबईतील बॉक्सर्सना फायदा होईल. परंतु मुंबईच्या बॉक्सर्समध्ये निर्णय, निर्धार आणि मेहनत घेण्याची क्षमता असेल तर आणि तरच ते पुढे जातील.