जि.प, पं.स जानेवारीच्या आत

By Admin | Updated: September 18, 2014 23:33 IST2014-09-18T23:33:31+5:302014-09-18T23:33:31+5:30

ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला

Zip, in pps January | जि.प, पं.स जानेवारीच्या आत

जि.प, पं.स जानेवारीच्या आत

पालघर : ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून  जिल्हापरिषदेच्या 57 निर्वाचीत विभाग (गट) व पंचायत समितीच्या 144 गणांची गटनिश्चिती करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानतर तेरा पंचायत समित्याचा कार्यकाल बरखास्त करण्यात आल्यानंतर जिल्हापरिषदेसह पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय कामकाज सुरू आहे. हा प्रशासकीय कार्यकाल सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येत नसल्याने विधानसभा निवडणुका पार पडल्या पडल्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 16 लाख 24 हजार इतकी लोकसंख्या असून पालघर तालुक्यात सर्वाधिक जिल्हापरिषदेचे 17 गट तर पंचायत समितीचे 34 गण तयार करण्यात आले असून सर्वात कमी मोखाडा तालुक्यात जिल्हापरिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण अस्तित्वात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण तयार करण्यात आले असून पालघर तालुक्यात 4 लाख 81 हजार लोकसंख्येनूसार जिल्हापरिषद 17 गट तर पंचायत समिती 34 गणांची निश्चिती संख्या करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात 3 लाख 51 हजार लोकसंख्या असन जि. प. 12 गट तर पं. स. च्या 24 जागा, तलासरी तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 54 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 तर पंचायत समितीच्या 1क् जागा, विक्रमगड तालुक्याची 1 लाख 37 हजार लोकसंख्या असून जिल्हापरिषदेसाठी 5 गट तर पंचायत समितीसाठी 1क् गणाच्या जागा, जव्हार तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 28 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 गट तर पंचायत समितीचे 1क् गण, वाडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 78 हजार इतकी असून जिल्हापरिषदेच्या 6 गट तर पंचायत समितीचे 12 गण, वसई तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 8 हजार इतकी असून जिल्हापरिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण, तर सर्वात कमी लोकसंख्या व जागा मोखाडय़ाची राहणार असून 83 हजार लोकसंख्या आधारावर जिल्हा परिषदेच्या 3 गट जागा तर पंचायत समितीच्या 6 गणांची जागांची निश्चिती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुका पार पाडल्या नंतर अल्पावधीतच वरील निवडणुका पार पडून 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत. (वार्ताहर)
 
निवडणूका नंतर मुहूर्त
विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत.

 

Web Title: Zip, in pps January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.