शहरं
Join us  
Trending Stories
1
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
2
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
3
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
4
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
5
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
6
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
7
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
8
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
9
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
10
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
11
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
12
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
13
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
14
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
15
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
16
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
17
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
18
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

शाळेतील पटसंख्या वाढल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 5:10 AM

जयंत पाटील : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण

अलिबाग : भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे, शिक्षकांची नोकरी टिकणे फार कठीण होणार आहे. विद्यार्थी टिकला पाहिजे, या भूमिकेतून शिक्षकांनी काम केल्यास भविष्यात समायोजन करण्याची वेळ येणार नाही. ज्या शाळेची पटसंख्या वाढेल त्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेने सत्कार करावा. आदर्श शिक्षकांबरोबरच चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे, प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अलिबागमधील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. शिक्षण क्षेत्रात आणि अभ्यासक्रमात झालेल्या फेरबदलामुळे शिक्षकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. डीएड-बीएड कॉलेज बंद करण्याची वेळ येऊ लागली आहे. इंग्रजी शाळांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले.शिक्षणाबरोबरच सामाजिक आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाच्या वेगवेगळ्या विकासासाठी, नवचैतन्यासाठी गुरुजनांनी पुढाकार घेऊन उत्तमरीत्या पाया घडविला पाहिजे. एके काळी मुंबई, पुणे, लातूर पॅटर्नची मक्तेदारी होती; परंतु ही मक्तेदारी मोडीत काढत कोकणचा वेगळा पॅटर्न दहावी व बारावी परीक्षेत राज्यात अव्वल स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याने त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.प्राथमिक विभागातील १५ आणि माध्यमिक १५ अशा एकूण ३० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. श्रीकांत देशपांडे, जि.प. अध्यक्ष अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आदीसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा